मुंबई, दि. (प्रतिनिधी) : गोरगरीब, दीनदलित, दुःखितांचे अश्रू पुसणे, त्यांना न्याय मिळवून देणे हीच खऱ्या अर्थाने शहीद ओमप्रकाश मिश्र यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दांत उत्तर मुंबई चे खासदार गोपाळ शेट्टी यांनी भारतीय जनता पक्षाच्या तसेच शहीद ओमप्रकाश मिश्र प्रतिष्ठान च्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. भारतीय जनता पक्षाचा कट्टर कार्यकर्ता व धडाडीचा नेता म्हणून ज्यांची बोरीवलीत ख्याती होती, अशा ओमप्रकाश मिश्र या तळागाळातील समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून त्यांना न्याय मिळे पर्यंत झटणाऱ्या नेत्याची २३ वर्षापूर्वी निर्घृण हत्या झाली. या हत्येच्या मुळापर्यंत जाऊन, तपास कार्यात भाग घेऊन प्रसंगी पोलीस पथकासोबत गुन्हेगारांना पकडण्यासाठी स्वतःच्या जीवावर उदार होऊन स्व.ओमप्रकाश मिश्र यांची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना पकडून देण्यात ज्यांनी मोलाची कामगिरी बजावली, असे ओमप्रकाश मिश्र यांचे निकटवर्ती व निस्सीम प्रेम करणारे भाजपाचे कार्यकर्ते इतकेच नव्हे तर ओमप्रकाश मिश्र यांच्या पावलावर पाऊल ठेऊन त्यांचा समाजसेवेचा वसा/वारसा घेऊन पुढे वाटचाल करीत असलेले प्रशांत पुजारी यांनी ओमप्रकाश मिश्र यांच्या निधनानंतर “ओमप्रकाश प्रतिष्ठान” या संस्थेमार्फत सातत्याने बोरीवली येथे समाजकार्य सुरु ठेवले आहे. गेली २३ वर्षे ओमप्रकाश मिश्र यांच्या पुण्यतिथीला रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, अपंगांना काठी, व्हील चेअर, चश्मा शिबीर, जनधन योजना अशा विविध समाजोपयोगी कार्यक्रमांच्या माध्यमातून गरीब जनतेला मदतीचा हात देण्यासाठी कार्यमग्न आहेत. आजही स्व.ओमप्रकाश मिश्र यांच्या २३ व्या पुण्यतिथीदिनी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्याच संकल्पनेतून संपूर्ण उत्तर मुंबईत ५००० रक्त बाटल्या/पिशव्या संकलित करण्याच्या उपक्रमा अंतर्गत “महारक्तदान शिबिराचे” आयोजन केले होते. या शिबिरात सुमारे २०० हून अधिक बाटल्या/पिशव्या रक्त जमा करण्यात आले. या उपक्रमाबद्दल व करीत असलेल्या अन्य सामाजिक कार्याबद्दल खासदार गोपाळ शेट्टी यांनी प्रशांत पुजारी यांचा विशेष सन्मान केला. देशातील गोरगरीब जनतेला असाध्य रोग निवारणासाठी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेता यावेत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘आयुष्मान भारत’ ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेद्वारे ओमप्रकाश प्रतिष्ठानच्या माध्यमातून बोरीवली पूर्व येथील सुमारे १८० गरीब लोकांना ‘आयुष्मान भारत’ कार्डाचेही मोफत वितरण खासदार शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. तळागाळातील गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचून त्यांना सेवा द्या, असे आवाहन गोपाळ शेट्टी यांनी उपस्थित समस्त भाजपा व ओमप्रकाश प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना केले व तीच ओमप्रकाश मिश्र यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. ओमप्रकाश मिश्र यांच्या गत आठवणींना उजाळा देत कार्यक्रमाची सांगता झाली. या प्रसंगी आमदार सुनील राणे, नगरसेवक विद्यार्थी सिंह तसेच भारतीय जनता पक्ष व ओमप्रकाश प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Similar Posts
भ्रष्टाचाराला रान मोकळे करून देणारा ४५९४९ कोटींचा पालिकेचा मोठा अर्थसंकल्प
मुंबई/ ५०० चौरस फूट पर्यंतच्या घराणं मालमत्ता कर माफ करणाऱ्या मुंबई महानगर पालिकेने यंदा ४५९४९ कोटींचा मोठा अर्थसंकल्प सादर करून पालिकेच्या पैशावर डल्ला मारण्यासाठी टपून बसलेल्यांना मोठे चराऊ कुरान उपलब्ध करून दिले आहेत अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी मोठी तरतूद आहे आणि हीच मोठी तरतूद कंत्राटदार आणि त्यांचे मायबाप असलेल्या पालिका प्रशासनाची कमाई आहे असा आरोप मुंबईकरांनी…
मुंबई विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमली दिंड्या- पताकांचे भार, घोड्याचे गोल रिंगण
मुंबई (प्रतिनिधी ): श्री वारकरी प्रबोधन महासमितीच्या वतीने निघणारा 23 वा पाडुरंगाचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला. विठू नामाच्या गजराने संपूर्ण मुंबई दुमदुमली. यावेळी पंढरीनाथ महाराज तावरे यांना वारकरी रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर अमृताश्रम महाराज जोशी यांना हैबतबाबा वारकरी सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ह.भ.प. रामेश्वर महाराज शास्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशिवसेना -शिंदे सेना संघर्ष जारी
मुंबई/ सध्या शिवसेना आणि शिदें सेना यांच्यात जो संघर्ष सुरू झाला आहे त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटू लागले आहेत . आज शिवसेना कार्यकर्त्यानी बंडखोर आमदार तानाजी सावंत यांचे पुण्यातील कार्यालय फोडले तर ठाण्यात शिंदे समर्थकांनी रस्त्यावर उतरून शक्ती प्रदर्शन केले . त्यामुळे रस्त्यावरचा हा संघर्ष आणखी पेटणार असून बंडखोर आमदार 30 जून पर्यंत गोहती मध्येच…
संभाजी भिडे याला महिला आयोगाची नोटीस
मुंबई/ तू अगोदर कुंकू लाव मगच तुझ्याशी बोलेन असे एका महिला पत्रकाराला सांगणाऱ्या संभाजी भिडे याला राज्य महिला आयोग नोटीस पाठवणार आहे.संभाजी भिडे यांनी काल मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यापूर्वी तुम्ही मंत्रालयात कोणाला भेटायला आले होते असता प्रश्न एका महिला पत्रकाराने संभाजी भिडे याना विचारताच ती अगोदर कुंकू लाऊन ये.प्रत्येक स्त्री भारतमाता आहे आणि भारतमाता…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयकर्नाल मध्ये स्फोटकांचा साठ्यासह बब्बर खालसाच्या चार अतिरेक्यांना अटक-महाराष्ट्रात घातपात घडवण्याचा कट फसला
कर्नाल/ महाराष्ट्रात सध्या मशिदींवरील भोग्याचा वाद सुरू आहे . त्यामुळे परिस्थिती काहीशी संवेदनशील बनलेली असतानाच महाराष्ट्रात मोठा घातपात घडवण्याचा कट फसल्याचे उघडकीस आले असून कर्नाल मध्ये स्फोटकांचा साठ्यासाह बब्बर खालसा चे चार दहशतवादी पोलिसांच्या हाती लागलेत .फीरोजपुर येथून एक इनोव्हा कार दिल्लीच्या दिशेने निघाली आहे आणि त्यात काही संशयास्पद लोक आहेत अशी माहिती हरयाणा पोलिसांना…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयपूरग्रस्तांसाठी साडे अकरा हजार कोटींची मदत जाहीर
पूरग्रस्तांसाठी साडे अकरा हजार कोटींची मदत जाहीर*पूर्ण घर उध्वस्त झालेल्यांना दीड लाख रुपये-*अंशत घरांचे नुकसान झालेल्या ५० ते २५ हजार–टपरी धारकांना १० हजार–*पूरग्रस्त कुटुंबाला १० हजार–*दुकानदारांना ५० हजार मुंबई/ पूरग्रस्त भागातील जनतेला अखेर महाराष्ट्र सरकारने साडे अकरा हजार कोटींचे मदत पॅकेज जाहीर केले आहे .धनादेशाद्वारे जाहीर मदत पूरग्रस्तांच्या खात्यात जमाकेली जाणार आहे मात्र ही मदत…
