मुंबई, दि. (प्रतिनिधी) : गोरगरीब, दीनदलित, दुःखितांचे अश्रू पुसणे, त्यांना न्याय मिळवून देणे हीच खऱ्या अर्थाने शहीद ओमप्रकाश मिश्र यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दांत उत्तर मुंबई चे खासदार गोपाळ शेट्टी यांनी भारतीय जनता पक्षाच्या तसेच शहीद ओमप्रकाश मिश्र प्रतिष्ठान च्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. भारतीय जनता पक्षाचा कट्टर कार्यकर्ता व धडाडीचा नेता म्हणून ज्यांची बोरीवलीत ख्याती होती, अशा ओमप्रकाश मिश्र या तळागाळातील समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून त्यांना न्याय मिळे पर्यंत झटणाऱ्या नेत्याची २३ वर्षापूर्वी निर्घृण हत्या झाली. या हत्येच्या मुळापर्यंत जाऊन, तपास कार्यात भाग घेऊन प्रसंगी पोलीस पथकासोबत गुन्हेगारांना पकडण्यासाठी स्वतःच्या जीवावर उदार होऊन स्व.ओमप्रकाश मिश्र यांची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना पकडून देण्यात ज्यांनी मोलाची कामगिरी बजावली, असे ओमप्रकाश मिश्र यांचे निकटवर्ती व निस्सीम प्रेम करणारे भाजपाचे कार्यकर्ते इतकेच नव्हे तर ओमप्रकाश मिश्र यांच्या पावलावर पाऊल ठेऊन त्यांचा समाजसेवेचा वसा/वारसा घेऊन पुढे वाटचाल करीत असलेले प्रशांत पुजारी यांनी ओमप्रकाश मिश्र यांच्या निधनानंतर “ओमप्रकाश प्रतिष्ठान” या संस्थेमार्फत सातत्याने बोरीवली येथे समाजकार्य सुरु ठेवले आहे. गेली २३ वर्षे ओमप्रकाश मिश्र यांच्या पुण्यतिथीला रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, अपंगांना काठी, व्हील चेअर, चश्मा शिबीर, जनधन योजना अशा विविध समाजोपयोगी कार्यक्रमांच्या माध्यमातून गरीब जनतेला मदतीचा हात देण्यासाठी कार्यमग्न आहेत. आजही स्व.ओमप्रकाश मिश्र यांच्या २३ व्या पुण्यतिथीदिनी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्याच संकल्पनेतून संपूर्ण उत्तर मुंबईत ५००० रक्त बाटल्या/पिशव्या संकलित करण्याच्या उपक्रमा अंतर्गत “महारक्तदान शिबिराचे” आयोजन केले होते. या शिबिरात सुमारे २०० हून अधिक बाटल्या/पिशव्या रक्त जमा करण्यात आले. या उपक्रमाबद्दल व करीत असलेल्या अन्य सामाजिक कार्याबद्दल खासदार गोपाळ शेट्टी यांनी प्रशांत पुजारी यांचा विशेष सन्मान केला. देशातील गोरगरीब जनतेला असाध्य रोग निवारणासाठी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेता यावेत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘आयुष्मान भारत’ ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेद्वारे ओमप्रकाश प्रतिष्ठानच्या माध्यमातून बोरीवली पूर्व येथील सुमारे १८० गरीब लोकांना ‘आयुष्मान भारत’ कार्डाचेही मोफत वितरण खासदार शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. तळागाळातील गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचून त्यांना सेवा द्या, असे आवाहन गोपाळ शेट्टी यांनी उपस्थित समस्त भाजपा व ओमप्रकाश प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना केले व तीच ओमप्रकाश मिश्र यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. ओमप्रकाश मिश्र यांच्या गत आठवणींना उजाळा देत कार्यक्रमाची सांगता झाली. या प्रसंगी आमदार सुनील राणे, नगरसेवक विद्यार्थी सिंह तसेच भारतीय जनता पक्ष व ओमप्रकाश प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Similar Posts
दिल्लीवरून फोन येताच राणेंचा आवाज बंद! — अटक आणि राडे बाजीच्या गाल बोटानंतर जन आशीर्वाद यात्रेचा समारोप
वेंगुर्ले/ शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांची राडेबाजी आणि राणेंची अटक यामुळे गाजलेल्या राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचा काल सिंधुदुर्गात समारोप झाला.मात्र दिल्ली वरून फोन आल्यामुळे राणेंचे शिवसेना वर प्रहार थांबले आहेत .पण सामना मधील टीकेला प्रहार मधून उत्तर देणार असे राणेंनी जाहीर केलेले आहेमुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची राणेंनी केलेली भाषा भाजपतील अनेक बड्या नेत्यांनी आवडलेली नाही खास करून…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयनिवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष -धनुष्य बाण कोणाचे आज फैसला
मुंबई/ शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात धनुष्य बाण या चीन्हावरून जो वाद सुरू झाला आहे त्यावर आज निवडणूक आयोग निकाल देणार आहे. त्यामुळे धनुष्य बाण ठाकरेंना मिळणार की शिंदेंना की हे चिन्ह गोठवले जाणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.शिवसेनेतून फुटलेल्या 16 आमदारांना अपात्र करण्या बाबतच्या याचिकेसह धनुष्यबाण या निवडणूक चिन्हं बाबतची याचिका सुधा सर्वोच्च…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयकाँग्रेस मध्ये परिवर्तन- कुटुंबातील फक्त एकालाच मिळणार निवडणुकीचे तिकीट
जयपूर/ सध्या काँग्रेसचे राजस्थान मध्ये जे चिंतन शिबीर सुरू आहे त्या शिबिरात एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार काँग्रेस मधील एका कुटुंबातील फक्त एकालाच निवडणुकीचे तिकीट देण्याचा क्रांतिकारी निर्णय काँग्रेसने घेतला आहे .त्यामुळे भविष्यात काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप होणार नाही .काँग्रेसच्या चिंतन शिबिरात गेल्या दोन तीन दिवसांपासून अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली . त्यातील महत्वाचा…
केंद्राच्या अध्यादेश विरूद्ध आम् आदमी पक्षाची आरपारची लढाई
दिल्ली/ तब्बल 12 वर्षांपूर्वी अण्णा हजारे यांनी ज्या दिल्लीच्या रामलीला मैदान वरून भ्रष्टाचार विरूद्ध आंदोलन छेडले होते त्याच रामलीला मैदानावरून आज आम् आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारच्या अन्यायकारक अध्यादेशाच्या विरूद्ध आरपारची लढाई सुरू केली आहे केंद्राच्या अध्यादेशाला संसदेत विरोध करण्यासाठी केजरीवाल यांनी सर्व विरोधी पक्षाचा नेत्यांची भेट घेतली तसेच आज दिल्लीत एक…
लतादीदींबद्दलचे गैरसमज त्यांच्या हयातीत दूर झाले ही सुखावणारी बाब ; बोरीवली येथे गानसम्राज्ञीला भावपूर्ण श्रद्धांजली !
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या बद्दल ‘ऐ मेरे वतन के लोगो’ या अजरामर ऐतिहासिक गीताच्या निर्मिती नंतर झालेला गैरसमज त्यांच्या हयातीत दूर होणे, ही त्यांच्या आयुष्यातील सुखावणारी बाब म्हणावी लागेल, लतादीदी या शरीराने जरी आपल्यात नसल्या तरी आपल्या सर्वांच्या आयुष्यात स्वररुपाने त्या सदैव आपल्यात आहेत, अशा…
मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवण्याचे बालिश आव्हान-राणा दांपत्याची नौटंकी सुरूच
मुंबई/ उद्धव ठाकरे यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी माझ्या विरुद्ध निवडणूक लढवून दाखवावी असे पोरकट आव्हान नवनीत राणा यांनी केल्यामुळे महाराष्ट्र खोखो हसत त्यांच्या या बालिशपणा ची थट्टा उडवत आहे .सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्यांना जमीन मंजूर केल्यानंतर रवी राणा यांची तुरुंगातून दुसऱ्या दिवशी सुटका झाली पण नवनित राणा मात्र प्रकृतीच्या कारणावरून लीलावती रुग्णालयात अँडमिट होत्या…
