मुंबई, दि. (प्रतिनिधी) : गोरगरीब, दीनदलित, दुःखितांचे अश्रू पुसणे, त्यांना न्याय मिळवून देणे हीच खऱ्या अर्थाने शहीद ओमप्रकाश मिश्र यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दांत उत्तर मुंबई चे खासदार गोपाळ शेट्टी यांनी भारतीय जनता पक्षाच्या तसेच शहीद ओमप्रकाश मिश्र प्रतिष्ठान च्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. भारतीय जनता पक्षाचा कट्टर कार्यकर्ता व धडाडीचा नेता म्हणून ज्यांची बोरीवलीत ख्याती होती, अशा ओमप्रकाश मिश्र या तळागाळातील समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून त्यांना न्याय मिळे पर्यंत झटणाऱ्या नेत्याची २३ वर्षापूर्वी निर्घृण हत्या झाली. या हत्येच्या मुळापर्यंत जाऊन, तपास कार्यात भाग घेऊन प्रसंगी पोलीस पथकासोबत गुन्हेगारांना पकडण्यासाठी स्वतःच्या जीवावर उदार होऊन स्व.ओमप्रकाश मिश्र यांची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना पकडून देण्यात ज्यांनी मोलाची कामगिरी बजावली, असे ओमप्रकाश मिश्र यांचे निकटवर्ती व निस्सीम प्रेम करणारे भाजपाचे कार्यकर्ते इतकेच नव्हे तर ओमप्रकाश मिश्र यांच्या पावलावर पाऊल ठेऊन त्यांचा समाजसेवेचा वसा/वारसा घेऊन पुढे वाटचाल करीत असलेले प्रशांत पुजारी यांनी ओमप्रकाश मिश्र यांच्या निधनानंतर “ओमप्रकाश प्रतिष्ठान” या संस्थेमार्फत सातत्याने बोरीवली येथे समाजकार्य सुरु ठेवले आहे. गेली २३ वर्षे ओमप्रकाश मिश्र यांच्या पुण्यतिथीला रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, अपंगांना काठी, व्हील चेअर, चश्मा शिबीर, जनधन योजना अशा विविध समाजोपयोगी कार्यक्रमांच्या माध्यमातून गरीब जनतेला मदतीचा हात देण्यासाठी कार्यमग्न आहेत. आजही स्व.ओमप्रकाश मिश्र यांच्या २३ व्या पुण्यतिथीदिनी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्याच संकल्पनेतून संपूर्ण उत्तर मुंबईत ५००० रक्त बाटल्या/पिशव्या संकलित करण्याच्या उपक्रमा अंतर्गत “महारक्तदान शिबिराचे” आयोजन केले होते. या शिबिरात सुमारे २०० हून अधिक बाटल्या/पिशव्या रक्त जमा करण्यात आले. या उपक्रमाबद्दल व करीत असलेल्या अन्य सामाजिक कार्याबद्दल खासदार गोपाळ शेट्टी यांनी प्रशांत पुजारी यांचा विशेष सन्मान केला. देशातील गोरगरीब जनतेला असाध्य रोग निवारणासाठी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेता यावेत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘आयुष्मान भारत’ ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेद्वारे ओमप्रकाश प्रतिष्ठानच्या माध्यमातून बोरीवली पूर्व येथील सुमारे १८० गरीब लोकांना ‘आयुष्मान भारत’ कार्डाचेही मोफत वितरण खासदार शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. तळागाळातील गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचून त्यांना सेवा द्या, असे आवाहन गोपाळ शेट्टी यांनी उपस्थित समस्त भाजपा व ओमप्रकाश प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना केले व तीच ओमप्रकाश मिश्र यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. ओमप्रकाश मिश्र यांच्या गत आठवणींना उजाळा देत कार्यक्रमाची सांगता झाली. या प्रसंगी आमदार सुनील राणे, नगरसेवक विद्यार्थी सिंह तसेच भारतीय जनता पक्ष व ओमप्रकाश प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Similar Posts
खरे महाराष्ट्र भूषण आजही दारिद्रयात –
1 मे हा महाराष्ट्र दिन कारण 1 मे 1960 साली महाराष्ट्र हे नवे राज्य अस्तित्वात आले. इथल्या मराठी माणसाला मुंबईसह महाराष्ट्र मिळाला पण तो मिळवण्यासाठी ज्या 105 हुतात्म्यांनी रक्त सांडले. ज्या लोकशाहीर मंडळींनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ घराघरात पोचवून लोकांना जागे केले. त्या शाहिरांची आज काय अवस्था आहे याची सरकारला कल्पना आहे का? शाहीर साबळे, शाहीर…
यूपीतील सर्व मदरस्याना- योग दिनाच्या आयोजनाचे आदेश
लखनौ – आज आंतरराष्ट्रीय योगदिवस आहे . त्यामुळे देशभर योगाशी संबंधित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यूपीतील सर्व मदरशांमध्ये, योगदिनाच्या निमित्त योगाचे कार्यक्रम आयोजित करावेत असे आदेश मदरसा शिक्षण परिषदेने दिले आहेतयुपी शिक्षण परिषदेच्या रजिस्टारने जारी केलेल्या आदेशानुसार, यूपीतील सर्व अनुदानित,विना अनुदानित, मान्यता प्राप्त मदरशांमध्ये भव्य स्वरूपात योगदिवस साजरा करावा असे आदेश…
उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.संतोष रेवणकर सेवानिवृत्त
मुंबई/ मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागात तब्बल 30 वर्षांहून अधिक काळ सेवा बजावणारे आणि जनतेचे डॉक्टर अशी ओळख निर्माण करणारे उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ संतोष रेवणकर हे सेवानिवृत्त नुकतेच झाले असून पालिकेचा आरोग्य विभाग आणि ज्या मुंबईकरांवर त्यांनी यशस्वी उपचार केले ते सर्वजण डॉ रेवणकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करीत आहेत. त्यांनी आपल्या सेवा…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयपंतप्रधान मोदी यांना पहिला लता मंगेशकर पुरस्कार
मुंबई/ गाणं सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने दिला जाणारा पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला . यावेळी संपूर्ण मंगेशकर कुटुंबीय या कार्यक्रमाला उपस्थित होते हृदयनाथ प्रकृती अस्वस्थ असल्याने उपस्थित राहू शकले नाहीत .माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात झालेल्या या सोहळ्याला राज्यपाल कोषारी आणि विरोधीपक्ष नेते फडणवीस हे सुधा हजर होते यावेळी बोलताना…
सर्व सरकारी आणि खाजगी रुग्णालयां मध्ये मास सक्ती
मुंबई : देशातील विविध राज्यांमध्ये कोविड-१९ विषाणू संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात देखील मागील काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंदाजानुसार मे महिन्यामध्ये कोविड संसर्ग बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेची सर्व रुग्णालये, तसेच सर्व खासगी रुग्णालयांनी देखील कोविड उपचारांसाठी सुसज्ज रहावे, अशी सूचना बृहन्मुंबई महानगरपालिका…
घोटाळ्यांच्या आरोप प्रत्यारोपाने अधिवेशनातील वातावरण तापले
नागपूर – सध्या नागपूर मध्ये सुरु असलेले विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन वेगवेगळ्या घोटाळ्यांच्या आरोप प्रत्यारोपाने चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्र्यांवर झालेल्या नागपूर मधील जमीन खोटल्यानंतर आता कृषिमंत्री अब्दुल सत्तर यांच्या जमीन घोटाळ्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले असून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे नागपूर हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा अपेक्षेप्रमाणे वादळी सुरु झाला. कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नावरुन विदर्भातील नागपूरमध्ये सुरु…
