भारताकडे पुरेसा तेलसाठा असल्याने चिंता नाही
नवी दिल्ली/खामेनी यांच्या मृत्यूमुळे पिसाळलेल्या इराणने आता जगावर आपला राग काढायला सुरुवात केली आहे.त्यासाठी इराणने जगाला ज्या मार्गाने तेलपुरवठा केला जातो त्या ते होर्मुज समुद्रधूनीचा मार्गच रोखून धरला आहे.त्यामुळे वेगवेगळ्या देशाचे अनेक तेल टँकर तिथे अडकून पडले आहेत.परिणामी जगभरात तेलाचा तुटवडा जाणवणार आहे पण भारताकडे मात्र पुढील २५ दिवस पुरेल इतका तेल साठा असल्याने चिंता नसल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे.तोवर ही कोंडी फुटेल.
अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यातील युद्ध अधिक भडकताना दिसत आहे. मात्र, या युद्धाचा फटका थेट संपूर्ण जगाला बसताना दिसतोय. कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये वाढ होताना दिसत आहे. इराणच्या तेल जहाजांवर मोठा हल्ला अमेरिकेकडून केला जात आहे. अमेरिका आणि इस्त्रायल मिळून इराणवर हल्ले करत आहे. इराणकडून अमेरिकेचे लष्कर तळ ज्या ज्या देशांमध्ये आहेत, तिथे हल्ले केली जात आहेत. कतार, साैदी अरेबिया, इराक, कुवेत अशा देशांवर हल्ले केले जात आहेत. शिवाय तेल प्रकल्पांनाही टार्गेट केले जात आहे. या युद्धाचा परिणाम भयंकर होण्याची शक्यता आहे. त्यामध्येच आता जगाची झोप उडवणारी बातमी पुढे येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्टेट ऑफ होर्मुजवर तेल टॅंकर ८० टक्के कमी झाल्याचे स्पष्ट होतंय. यासोबतच जल मार्गावर हजारो टँकरचा मोठा जाम लागला आहे.
हा परिस्थिती अशावेळी आहे, ज्यावेळी इराण रिवॉल्युशनरी गार्ड्सने स्टेट बंद करण्याची मोठी आणि धक्कादायक घोषणा केली. हेच नाही तर येथून जाणाऱ्या टँकरला थेट आग लावून देण्याचीही धमकी त्यांनी दिली. 1 मार्च रोजी फक्त ३ तेल टँकर होर्मुजहून गेले. ज्यामध्ये २८ लाख बॅरल होते. 2 मार्चला फक्त एक छोटे टँकर गेले. १.५ करोड बॅरल म्हणजेच २० टक्के कच्चे तेल होर्मुज जलडमरूमधून जाते.हा तेल मार्ग अत्यंत महत्वाचा आहे. मात्र, आता जाणारी वाहतूक जवळपास बंद आहे आणि हे अत्यंत मोठे संकट आहे. इराण आणि अन्य देशातून जाणाऱ्या कच्च्या तेलाची संख्या खूपच जास्त कमी आहे. यामुळे कच्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ होऊ शकते. इराणचे कमांडर इन चीफ यांचे सल्लागार इब्राहिम जबारी यांनी ऑफ होर्मुज बंद केल्याची मोठी घोषणा केली.हेच नाही तर या मार्गाने कोणी जाण्याची हिंमत केली तर आम्ही तेल टँकरला आग लावू अशी धमकीही त्यांनी दिली. यासर्व पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांसोबत भारत सरकारने महत्वाची बैठक घेतली आणि या काळात भारताकडे नक्की किती तेल शिल्लक आहे, याची तपासणी केली. मिळालेल्या माहितीनुसार, सध्याच्या घडीला भारताकडे २५ दिवस पुरेल इतके तेल शिल्लक आहे

