मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूमुळे राज्यावर शोककळा पसरल्याचं चित्र आहे. मुंबईहून बारामतीकडे येताना त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. तांत्रिक बिघाडामुळे हा विमान अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असून फॉरेन्सिक टीम त्याचा तपास करत आहे.
फॉरेन्सिक टीमच्या हाती अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडल्यामुळे हा अपघात नेमका कसा आणि का झाला याची माहिती मिळणार आहे. या विमान अपघातामध्ये सर्वजण म्हणजे, पाचही जण मृत्यूमुखी पडल्यामुळे ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून या अपघाताचा तपास करता येणं शक्य आहे. त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचे पथक बारामतीत दाखल झाले आहे.दरम्यान या अपघातानंतर राजकारण पेटले असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी केली आहे.अखिलेश यादव यांनी तशीचवमग्नी केली आहे

