मराठा आरक्षणाचा वानवा साताऱ्यात पोहचला – नेत्यांना गावबंदी पाठोपाठ मतदानावरही बहिष्कार
वाई (जि. सातारा) : मराठा आरक्षणासाठी पुढाऱ्यांना गावबंदीचा वणवा सातारा जिल्ह्यातही पोहोचला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटल्यानंतर गावागावात नेत्यांना गाव बंदी केली जात आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील शेलारवाडीत नेत्यांना नुसती बंदी घातली नाही, तर येणाऱ्या सर्वच मतदानावर बहिष्कार टाकल्याने धाबे दणाणले आहेत.आरक्षणासाठी राज्यभरात पुढाऱ्यांना गावबंदी, काळे झेंडे दाखवण्यात येत आहेत. आत्महत्येसारखा दुर्दैवी प्रकारही घडत…
