मुंबई, दि. (प्रतिनिधी) : तीन दिवसांपूर्वी मुंबईतील मालवणी परिसरात रहाणा-या एका हिंदू युवतीला फसवून मुस्लिम समाजातील एका युवकाने पळवून नेल्याचा प्रकार घडला. घडलेला प्रकार कांदिवली पोलिस ठाण्याचे अति.आयुक्त. प्रविण पडवळ यांना भाजपाचे वरिष्ठ नेते आर. यु. सिंह यांनी निदर्शनास आणून देताच ह्या कार्यक्षम आधिका-याने आपली सर्व शक्ती -युक्ती कामाला लावत अवघ्या तीन दिवसांत ह्या पळवून नेलेल्या युवतीला हैद्राबाद येथून सहीसलामत सोडवून तिच्या आई-वडिलांच्या हाती सूपूर्द केले. अति.आ.प्रविण पडवळ यांनी दाखवलेल्या चातुर्याबद्दल नुकताच खासदार गोपाळ शेट्टी यांनी त्यांचा त्यांच्या कार्यालयात जाऊन सत्कार केला. राजकीय जीवनांत काम करत असतांना पोलिसांबरोबर अनेक वादाचे प्रसंग येतात परंतु चांगले कामे करणाऱ्या पोलिस आधिकाऱ्यांचे कार्य समाजापुढे येणेही तितकेच गरजेचे आहे. या वर्षभरात अशाप्रकारे फसवणूकीचे १०३ प्रकार घडले असून त्या पैकी ७८ युवतींना यातून सोडवण्यात मुंबई पोलिसांना यश आले असल्याची माहिती पडवळ यांनी खासदार गोपाळ शेट्टी यांना दिली. मुंबईच्या बिघडलेल्या कायदा व सुरक्षे बद्दल चिंता व नाराजी व्यक्त करुन मुंबईतल्या कायदा व सुरक्षा व्यवस्था सुधारण्यासाठी प्रविण पडवळ यांच्या सारख्या कार्यक्षम पोलिस अधिकाऱ्यांची गरज असल्याचे प्रतिपादन खासदार गोपाळ शेट्टी यांनी या सत्कार प्रसंगी बोलतांना केले. चांगल्या कामांसाठी पोलिस व लोकप्रतिनिधींनी हातात हात घालून काम करण्याची गरज आहे, असेही मत शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले. तरुण युवतींची फसवणूक टाळण्यासाठी सर्वच पालकांनी दक्षता घ्यावी, असेही आवाहन शेट्टी यांनी केले आहे.
Similar Posts
व्हीजीएन ज्वेलर्स चा मालक याला ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने केले अटक
ठाणे: गुंतवणूक योजनेच्या माध्यमातून कमी कालावधीमध्ये जास्त पैसे देण्याचे आमिष दाखवून १३ गुंतवणूकदारांची जवळपास ८ कोटींची फसवणूक करणाऱ्या ‘ व्हीजीएन ज्वेलर्स मालक विरीथगोपालन नायर याला ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. न्यायालयाने नायर याला ९ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
भिवंडीत एक मजली इमारत कोसळली , एकाचा मृत्यू तर सात जण जखमी…
भिवंडी (आकाश गायकवाड ) शहरातील आजमी नगर येथील टिपू सुलतान चौक परिसरात असलेली एक मजली इमारत कोसळल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. या दुर्घटनेत एक जणाचा मृत्यू तर आठ जण जखमी झाले आहेत. रजाक ( वय अंदाजे ३५ ते ४० वर्ष ) असे दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. तर हसीम शेख ३५, सुबेदा…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई: ईडीकडून आघाडीच्या नेत्यांना धक्क्यावर धक्के -नवाब मलिक यांच्या 8 मालमत्ता जप्त
मुंबई/ सध्या अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या 8 मालमत्ता काल इडिणे जप्त केल्या त्यामुळे राष्ट्रवादी मध्ये खळबळ माजली आहे जप्त केलेल्या मालमत्ता मध्ये गोवावळा कंपाऊंड येथील वादग्रस्त मलमतेचाही समावेश आहेकुरल्याच्या गोवा वाला कांपौंड मधील 3 एकर जमीन नवाब मलिक यांनी बॉम्ब स्फोटातील आरोपी कडून विकत घेतली होती या व्यवहारात दाऊदची…
गुन्हे | ताज्या बातम्या | महापालिका | मुंबईपालिकेतील आंधळे दळत आहेत आणि कुत्रे पीठ खात आहेत
बनावट कागदपत्रांच्या आधारे २८वर्ष पालिकेत नोकरी करणाऱ्या भामटयाला अटकमुंबई/भ्रष्टाचार हा आता या देशाचा स्थायी भाव बनलाय त्यामुळे ग्राम पंचायत पासून राष्ट्रपती भवणापर्यंत असे एकही ठिकाण नाही की जिथे भ्रष्टाचार होत नसेल.पण या सगळ्यात मुंबई महापालिका वरच्या क्रमांकावर आहे.जेवढं नाव मोठं तेवढा भ्रष्टाचार सुधा मोठा .मुंबई महापालिकेत आजवर पालिका अधिकारी,नगरसेवक आणि कंत्राटदारांचे घोटाळे बाहेर निघत होते…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराज ठाकरेंच्या भाषणाची शिवसेनेतील मराठी तरुणांना भूरळ
मुंबई/ गुडी पाडवा मेळाव्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी मुंबईच्या शिवतीर्थावर जे भाषण केले त्यावर सेनेतील बडे नेते भलेही टीका करीत असेल तरी सामान्य शिवसैनिक मात्र राजच्या भाषणाने प्रभार्वित झाला आहे .कारण मुस्लिमांच्या विरोधात प्रथमच एका मराठी नेत्याने जाहीरपणे आवाज उठवून मशिदींवरील भोंगे काढून टाकण्याची मागणी केली आहे . त्यामुळें महाराष्ट्रातील सर्वच पक्षातील मराठी तरुण खुश…
रायगड मधून आठ महिन्यात 250 महिला , मुली बेपत्ता – धक्कादायक-मोबाईल ,सोशल मिडियाचा वापर वाढल्याने अल्पवयीन मुलीबरोबर विवाहीतही बेपत्ता
रायगड जिल्ह्यात गत काही महिन्यापासून 18 वर्षाखालील मुलीं बरोबर विवाहित बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे . जिल्ह्यात आठ महिन्यात 250 जण बेपत्ता झाल्याची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे त्यामध्ये 156 महिलांचा समावेश आहे . मोबाईल ,सोशल मिडियाचा वापर वाढल्याने अल्पवयीन मुलीबरोबर विवाहीतही बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे .वेगवेगळी आमिषे दाखवून मुलींना फूस लावून पळविण्यात…
