मुंबई, दि. (प्रतिनिधी) : माझी जन्मभूमी नंदुरबार असून माझी कर्मभूमी अंबरनाथ आहे. व्यावहारिक आणि व्यावसायिक गरज म्हणून मी आणि मुकुंद कुलकर्णी मुंबईच्या सागरात पोहत असलो तरी आणि शरीराने जरी मुंबईत असलो तरी मनाने आम्ही अंबरनाथ मध्येच आहोत. त्यामुळे ज्या ज्या व्यासपीठावर संधी मिळेल त्या त्या ठिकाणी आम्ही अंबरनाथची बाजू, प्रश्न विविध प्रकारचे मुद्दे मांडत असतो. त्यामुळे अंबरनाथकरांनी आज आमचा सन्मान केला हा आम्ही आमच्या घरच्या माणसांनी केलेला सन्मान समजतो आणि घरच्या माणसांनी सन्मान करुन आमच्या पाठीवर कौतुकाची, शाबासकीची मारलेली थाप आणि हा सन्मान हा आम्हाला भारतरत्न, पद्म पुरस्कारासमान निश्चितच वाटतो, अशा शब्दांत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करुन अंबरनाथ शहराचे नांव उज्ज्वल करणाऱ्या प्रतिभावंतांचा सन्मान सोहळा अंबरनाथ शहर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, अंबरनाथ तर्फे आयोजित करण्यात आला होता. कोकण नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष, अंबरनाथ जयहिंद बँकेचे संस्थापक विलासराव देसाई, भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयाचे सचिव मुकुंद कुलकर्णी आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांचा सेवानिवृत्त सरकारी अधिकारी सुभाष काळे, मोरेश्वर पटवर्धन, राजेंद्र परोळसांदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपत्र, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलतांना योगेश त्रिवेदी म्हणाले की, सत्कार बरेच होतात, पुरस्कार सुद्धा मिळतात परंतु घरातील आपल्या माणसांनी आपल्या पाठीवर मारलेली कौतुकाची, शाबासकीची थाप ही मौल्यवान असते त्यामुळे अंबरनाथ शहर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने केलेला आमचा सन्मान हा भारतरत्न, पद्म पुरस्कार इतकाच महत्त्वाचा वाटतो. अंबरनाथ शहर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचे झोमणशेठ अध्यक्ष असतांना मी उपाध्यक्ष होतो आणि पुण्याला महाराष्ट्र सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अधिवेशन होते. कालनिर्णय कार ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगांवकर हे अध्यक्ष आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रतापराव गोडसे हे कार्याध्यक्ष होते. झोमणशेठ आणि मी अशा आम्ही दोघांनी अंबरनाथचे प्रतिनिधित्व त्या अधिवेशनात करुन गणेशोत्सव साजरा करतांना आपली संस्कृती, परंपरा कशी जतन करावी, याची साग्रसंगीत माहिती जाणून घेत अंबरनाथ मध्ये ती देण्याचा प्रयत्न केला. अंबरनाथ चे प्रश्न सोडविण्यासाठी माझ्या पत्रकारितेचा उपयोग करुन घेतला. शिवमंदिर पर्यटन केंद्र करणे असो की कल्याण महानगरपालिका क्षेत्रातून अंबरनाथ वगळण्याचा नऊ वर्षांचा संघर्ष असो, की शिवदर्शन बंगला पुनश्च अंबरनाथ मध्ये आणणे, अंबरनाथ तालुका निर्मिती अशा अनेक महत्वपूर्ण विषयात सहभाग घेतला. एक अंबरनाथकर म्हणून आपण कधीही हाक मारा, मी आणि मुकुंद कुलकर्णी तुमच्या हाकेला प्रतिसाद दिल्याशिवाय राहणार नाही, असेही योगेश त्रिवेदी यांनी आवर्जून नमूद केले. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतांना काम करीत राहणे हे महत्त्वाचे आहे. टीकाकार टीका करीत राहतील पण आपण ते मार्गदर्शन म्हणून पहायला हवे, लोकांचा सहभाग जास्तीत जास्त कसा वाढेल याकडे लक्ष द्यावे, अशी सूचना मुकुंद कुलकर्णी यांनी केली. मंडळाचे अध्यक्ष मोरेश्वर पटवर्धन, उपाध्यक्ष संतोष दबडे, पांडुरंग जवादे, हेमलता गांगल, वसुंधरा वझे, सरचिटणीस राजेंद्र परोळसांदे, पदाधिकारी सचिन वैद्य, भगवान सासे, विजयन नायर, गणेश शेटे, ललित बकरे, बाळा दलाल, पौरोहित्य करणारे चंद्रकांत भास्कर कुलकर्णी आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. हा उत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचाही सत्कार करण्यात आला. राजेंद्र परोळसांदे यांनी आपल्या भावना पोटतिडकीने मांडून हा ६९ वा उत्सव शतकोत्तर होवो आणि त्यासाठी सर्वांनी हिरीरीने सहकार्य करावे असे आवाहन केले. या महोत्सवात आमदार डॉ. बालाजी किणीकर, पूर्णिमा कबरे, हेमंत गोगटे, किसनराव तारमळे, शोभा शेट्टी आदी मान्यवरांच्या हस्ते विशाखा सुभेदार, सिद्धी गंगावणे, पायल कबरे, किरण माने, सुधीर टाकळकर, डॉ. समीर कुलकर्णी, राजेंद्र कर्णिक, शीतल जोशी, मनीषा वाळेकर, डॉ. मनोज कंदोई, प्रदीप ताम्हाणे, सागर जाधव, मोहन कुलकर्णी, अविनाश सुरसे, सुशील दलाल आदी प्रतिभावंतांचा सन्मान करण्यात आला.
Similar Posts
महापालिकेचा 52 हजार कोटींचा सरकारी निवडणुक संकल्प
मुंबई/ ओबीसी आरक्षणात अडकलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या दोन ते तीन महिन्यात होणार आहेत आणि या वेळेस कोणत्याही परिस्थितीत भाजपला मुंबई महापालिका जिंकायची असल्याने कोणतीही करवाढ करून मुंबईकरांना दुखवू नका अशा सूचना सरकारकडून पालिका प्रशासनाला मिळाल्याची चर्चा होती आणि म्हणूनच कोणतीही करवाढ नसलेला 52 हजार 600 कोटींचा अर्थसंकल्प प्रशासनाने सादर केला पण विकास कामासाठी…
फ्रिज मधून खोके कुठे गेले याची चौकशी करणार – मुख्यमंत्री
मुंबई/उद्धव ठाकरे यांनी 50 खोक्याबाबत केलेले विधान मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेतले असून आता फ्रिज मधले खोके कोणाच्या कपाटात गेले याची चौकशी केली जाणार आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले तसेच उद्धव ठाकरे यांचे सध्या मानसिक संतुलन बिघडले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. खोके आणि कपाटे यांची चौकशी जर झाले तर प्रकरण खूपच गंभीर होईल अशी शक्यता…
प्रभाग रचना सुधारणा विधेयक मंजूर निवडणूक लांबणीवर
मुंबई/ ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा जो तिढा निर्माण झाला आहे त्यावर राज्य सरकारने मार्ग काढला आहे त्यानुसार आज ओबीसी आरक्षणाचे सुधारित विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सर्वानुमते मंजूर करण्यात आल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार आहेत.ओबीसी आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता त्यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा गुंता पुन्हा वाडला होता दरम्यान मध्य प्रदेशात…
गुन्हे | ताज्या बातम्या | मुंबई | राजकीयसचिन वाझेला माफीचा साक्षीदार करण्यास न्यायालयाची मंजुरी
मुंबई – अनिल देशमुख यांच्या शंभर कोटींच्या खंडणी प्रकरणात सीबीआयला सर्व प्रकारची माहिती माहिती पुरवून चांगली मदत केल्याबद्दल सीबीआयच्या शिफारशीवरून सत्र न्यायालयाने सचिन वाझे यांना माफीचा साक्षीदार बनवले आहे. दरम्यान या निर्णयाला विरोध करणारा या प्रकरणातील एक आरोपी कुंदन शिंदे याची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. सचिन वाझे माफीचा साक्षीदार झाल्याने १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात अनिल…
गणेशोत्सवासाठी पालिकेची नियमावली जारी विसर्जन मिरवणुकीला बंदी; विसर्जनाला फक्त१० जनाणाच परवानगी
मुंबई करोनाचा संकटाचे निमित करून सणांवर निर्बंध घातले जात असून काल गणेशोत्सव बाबत पालिकेने नियमावली जारी केली आहेगणेशोत्सवात घरगुती मूर्ती फक्त २ फुटांची तर सार्वजनिक उत्सव मंडळाची गणेशमूर्ती फक्त ४ फुटांची असावी.सार्वजनिक गणेश मंडपात गर्दी करू नये.विसर्जनासाठी फक्त १० लोकांनाच परवानगी असेल . ध्वनीक्षेपकांचा आवाजवरही निर्बंध लावण्यात आलेत .मोठ्या गणेशोत्सवातील बाप्पांचे दर्शन ऑनलाइन असेल अशा…
काळया यादीतील कंत्राटदारांचे पालिकेतील आश्रयदाते कोण?
मुंबई/ महापालिकेत अधिकारी कंत्राटदार आणि सत्ताधारी यांचे एक सिंडिकेट असून रस्त्याची निकृष्ट दर्जाची कामे करणारे कंत्राटदार असोत की नाले सफाई करणारे कंत्राटदार असोत या कंत्राटदारांनी पालिकेला किती जरी चुना लावला तरी त्यांची पगडी सलामत राहते आणि काळया यादीत नाव येवून सुधा पुन्हा त्याच कंत्राटदारांना काम मिळते हे सर्व रॅकेट कशा प्रकारे पालिकेत काम करते याची…
