मुंबई, दि. (प्रतिनिधी) : माझी जन्मभूमी नंदुरबार असून माझी कर्मभूमी अंबरनाथ आहे. व्यावहारिक आणि व्यावसायिक गरज म्हणून मी आणि मुकुंद कुलकर्णी मुंबईच्या सागरात पोहत असलो तरी आणि शरीराने जरी मुंबईत असलो तरी मनाने आम्ही अंबरनाथ मध्येच आहोत. त्यामुळे ज्या ज्या व्यासपीठावर संधी मिळेल त्या त्या ठिकाणी आम्ही अंबरनाथची बाजू, प्रश्न विविध प्रकारचे मुद्दे मांडत असतो. त्यामुळे अंबरनाथकरांनी आज आमचा सन्मान केला हा आम्ही आमच्या घरच्या माणसांनी केलेला सन्मान समजतो आणि घरच्या माणसांनी सन्मान करुन आमच्या पाठीवर कौतुकाची, शाबासकीची मारलेली थाप आणि हा सन्मान हा आम्हाला भारतरत्न, पद्म पुरस्कारासमान निश्चितच वाटतो, अशा शब्दांत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करुन अंबरनाथ शहराचे नांव उज्ज्वल करणाऱ्या प्रतिभावंतांचा सन्मान सोहळा अंबरनाथ शहर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, अंबरनाथ तर्फे आयोजित करण्यात आला होता. कोकण नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष, अंबरनाथ जयहिंद बँकेचे संस्थापक विलासराव देसाई, भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयाचे सचिव मुकुंद कुलकर्णी आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांचा सेवानिवृत्त सरकारी अधिकारी सुभाष काळे, मोरेश्वर पटवर्धन, राजेंद्र परोळसांदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपत्र, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलतांना योगेश त्रिवेदी म्हणाले की, सत्कार बरेच होतात, पुरस्कार सुद्धा मिळतात परंतु घरातील आपल्या माणसांनी आपल्या पाठीवर मारलेली कौतुकाची, शाबासकीची थाप ही मौल्यवान असते त्यामुळे अंबरनाथ शहर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने केलेला आमचा सन्मान हा भारतरत्न, पद्म पुरस्कार इतकाच महत्त्वाचा वाटतो. अंबरनाथ शहर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचे झोमणशेठ अध्यक्ष असतांना मी उपाध्यक्ष होतो आणि पुण्याला महाराष्ट्र सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अधिवेशन होते. कालनिर्णय कार ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगांवकर हे अध्यक्ष आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रतापराव गोडसे हे कार्याध्यक्ष होते. झोमणशेठ आणि मी अशा आम्ही दोघांनी अंबरनाथचे प्रतिनिधित्व त्या अधिवेशनात करुन गणेशोत्सव साजरा करतांना आपली संस्कृती, परंपरा कशी जतन करावी, याची साग्रसंगीत माहिती जाणून घेत अंबरनाथ मध्ये ती देण्याचा प्रयत्न केला. अंबरनाथ चे प्रश्न सोडविण्यासाठी माझ्या पत्रकारितेचा उपयोग करुन घेतला. शिवमंदिर पर्यटन केंद्र करणे असो की कल्याण महानगरपालिका क्षेत्रातून अंबरनाथ वगळण्याचा नऊ वर्षांचा संघर्ष असो, की शिवदर्शन बंगला पुनश्च अंबरनाथ मध्ये आणणे, अंबरनाथ तालुका निर्मिती अशा अनेक महत्वपूर्ण विषयात सहभाग घेतला. एक अंबरनाथकर म्हणून आपण कधीही हाक मारा, मी आणि मुकुंद कुलकर्णी तुमच्या हाकेला प्रतिसाद दिल्याशिवाय राहणार नाही, असेही योगेश त्रिवेदी यांनी आवर्जून नमूद केले. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतांना काम करीत राहणे हे महत्त्वाचे आहे. टीकाकार टीका करीत राहतील पण आपण ते मार्गदर्शन म्हणून पहायला हवे, लोकांचा सहभाग जास्तीत जास्त कसा वाढेल याकडे लक्ष द्यावे, अशी सूचना मुकुंद कुलकर्णी यांनी केली. मंडळाचे अध्यक्ष मोरेश्वर पटवर्धन, उपाध्यक्ष संतोष दबडे, पांडुरंग जवादे, हेमलता गांगल, वसुंधरा वझे, सरचिटणीस राजेंद्र परोळसांदे, पदाधिकारी सचिन वैद्य, भगवान सासे, विजयन नायर, गणेश शेटे, ललित बकरे, बाळा दलाल, पौरोहित्य करणारे चंद्रकांत भास्कर कुलकर्णी आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. हा उत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचाही सत्कार करण्यात आला. राजेंद्र परोळसांदे यांनी आपल्या भावना पोटतिडकीने मांडून हा ६९ वा उत्सव शतकोत्तर होवो आणि त्यासाठी सर्वांनी हिरीरीने सहकार्य करावे असे आवाहन केले. या महोत्सवात आमदार डॉ. बालाजी किणीकर, पूर्णिमा कबरे, हेमंत गोगटे, किसनराव तारमळे, शोभा शेट्टी आदी मान्यवरांच्या हस्ते विशाखा सुभेदार, सिद्धी गंगावणे, पायल कबरे, किरण माने, सुधीर टाकळकर, डॉ. समीर कुलकर्णी, राजेंद्र कर्णिक, शीतल जोशी, मनीषा वाळेकर, डॉ. मनोज कंदोई, प्रदीप ताम्हाणे, सागर जाधव, मोहन कुलकर्णी, अविनाश सुरसे, सुशील दलाल आदी प्रतिभावंतांचा सन्मान करण्यात आला.
Similar Posts
गरीबांचे अश्रू पुसणे हीच शहीद ओमप्रकाश मिश्र यांना खरी श्रद्धांजली ; खासदार गोपाळ शेट्टी यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : गोरगरीब, दीनदलित, दुःखितांचे अश्रू पुसणे, त्यांना न्याय मिळवून देणे हीच खऱ्या अर्थाने शहीद ओमप्रकाश मिश्र यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दांत उत्तर मुंबई चे खासदार गोपाळ शेट्टी यांनी भारतीय जनता पक्षाच्या तसेच शहीद ओमप्रकाश मिश्र प्रतिष्ठान च्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. भारतीय जनता पक्षाचा कट्टर कार्यकर्ता व धडाडीचा नेता म्हणून ज्यांची बोरीवलीत…
बाळासाहेबांचे नाव फितुरानी पळवले- शिवसेनेला मशाल!
दिल्ली/ शिवसेना आणि शिंदे गट यांच्या मध्ये नाव आणि निवडणूक चिन्ह यावरून जो वाद होता तो निवडणूक आयोगाने त्यांच्या पद्धतीने संपवला आहे.शिंदे गटाला नाव मिळाले आहे बाळासाहेबांची शिवसेना तर उद्धव गटाच्या शिवसेनेला नाव मिळालं आहे . उद्वव बाळासाहेब शिवसेना तसेच शिवसेनेला मशाल हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे .निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हं गोठवल्या नंतर…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईते जिथं असतील तिथून शोधून काढू – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
पीएफआय या संघटनेवर एनआयएने केलेल्या कारवाईविरोधात पुण्यात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्याचा प्रकार घडला. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रात आणि भारतात कुणी पाकिस्तान जिंदाबादची घोषणा देणार असेल तर त्याला सोडणार नाही. त्याच्यावर कारवाई करू. ते जिथं असतील तिथून शोधून काढून कारवाई करू . नागपूरमध्ये पत्रकारांशी…
बुधवारपासून स्वामी समर्थच्या व्यावसायिक कबड्डीचा आवाज – बलाढ्य 12 संघ एकमेकांशी भिडणार
मुंबई, दि. ५ (क्री.प्र.)- एकापेक्षा एक कबड्डीपटू… शेरास सव्वाशेर असे तगडे संघ… कबड्डीचा आवाज वाढवणारा दमदार सोहळा… एकेका गुणासाठी चढाई- पकडींची होणारी ठस्सन… संघांना लक्षाधिश करणारे मान आणि सन्मान… कबड्डीपटू,कबड्डीप्रेमी आणि कबड्डी संघटकांना प्रेमात पाडणारे दिमाखदार आयोजन… सारेच काही एका मॅटवर पाहण्याची रोमहर्षक संधी कबड्डीप्रेमींना लाभणार आहे ती प्रभादेवीच्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या कबड्डी स्पर्धेत….
बॉलिवूड मधील मोगली भाईजान
सध्या इतिहासाची परिभाषा आपापल्या सोयीनुसार निश्चित करण्याची चढाओढ लागली आहे.इतिहास बदलता येत नाही पण त्याचे विद्रुपीकरण करता येते.हे आजवर समाजाने पाहिलेले आहे.आणि यात अनेक विचारवंत आणि इतिहासाचे अभ्यासक अग्रेसर आहेत.पण धर्मनिरपेक्षता सिद्ध करण्यासाठी अल्पसंख्यांकांना चुचकारणे ही सुधा काळाची गरज बनली आहे. त्यासाठी अल्पसंख्यांक समाजाची बाजू घेऊन जो भारता विरुद्ध बोलेल तो खरा विचारवंत! अशी या…
पालिका आणि सरकार झोपले आहेत का?
धक्कादायक! मुंबईत सरकार जमिनीवर २०० अनधिकृत इमारतीमुंबई/सध्या मुंबईची धर्मशाळा झाली आहे देशाच्या वेगवेगळ्या काना कोपऱ्यातून कुणीही येतो आणि आणि मिळेल तिथे चार बांबू ठोकून निवारा उभा करतो सुरवातीला ताडपत्र्या आणि प्लास्टिक च्या कागदानी केलेल्या या अनधिकृत बांधकामांवर पुढे पत्रे आणि कौले चढतात पालिका त्यांच्यासाठी रस्ते शौचालये नळपाणी आणि दिवा बत्तीची सोय करते त्यामुळे एकाच्या दोन…
