: मुंबई – भाजपा नेते सध्या शिवसेनेच्या मागे हात धुवून लागले आहेत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब याना 100 कोटींच्या खंडणी प्रकरणात इडीच्या चौकशीला सामोरे जावे लागलेले असतानाच .आता तिकीट यंत्र खरेदी प्रकरणात गुरुवारी लोकायुक्त त्यांची चौकशी करणार आहेत . भाजप नेते मिहिर कोटेचा यांनी सदर प्रकरणी परब यांच्या विरोधात राज्यपाल कोशारी यांच्याकडे तक्रार केली होती .त्यात म्हटले होते की लॉकडाउन काळात आय टी क्षेत्रातील कंपन्यांची वाईट अवस्था झाली होती . त्यामुळे इलेक्ट्रानिक तिकीट यंत्र खरेदी निविदा प्रक्रियेतील एनवेळी बदल करण्याचे आदेश परब यांनी दिले होते . त्यानुसार कंत्राटदारच्या वार्षिक उलाढालीची 150 .कोटी वरुण 100 कोटींवर आणण्यात आली . त्याच बरोबर निविदेतील अटी आणि शर्तीमध्ये आणखी काही बदल करण्यात आले निविदां मधील शर्ती मधील बदल मंजुरीसाठी संचालक मंडळपुढे ठेवावेत अशी सूचना महाव्यवस्थापकांनी केली पण परिवहन मंत्र्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि अगोदर निविदा प्रप्र्सिद्ध करावी आणि नंतर तिला संचालक मंडळाची मंजूरी घ्यावी असे आदेश परिवहन मंत्र्यांनी दिले .मर्जीतील एका कंत्राटदारला काम देण्यात आले त्याचा परिवहन मंडळाला 250 कोटींचा भुर्दंड बसणार आहे . त्यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करावी अशी कोटेचा यांची मागणी आहे .
Similar Posts
प्लांट न्यूज आणि फेक मीडिया
सध्याचे राजकारण हे गटारातून वाहणाऱ्या घान पाण्यापेक्षाही घाणेरडे आहे.आणि कुठलाही सज्जन माणूस या घाणेरड्या पाण्याच्या आसपास सुधा फिरकणार नाही या लोकांच्या आसपास फक्त आणि फक्त इलेक्ट्रॉनिक मिडीयावाले आहेत.आणि 24 तास ते लोक याच घाणेरड्या राजकारणाच्या बातम्या दाखवत आहेत. आणि त्या बघून बघून लोकांना इतका कंटाळा आलाय की काहींनी आपल्या केबल ऑपरेटर ना सांगून न्यूज चॅनल…
शिवसेना- शिंदे गट आमने सामने- दसरा मेळाव्यात राडा होण्याची शक्यता
मुंबई/ महाराष्ट्र समोर समस्यांचे डोंगर उभे असताना इथल्या राज्यकर्त्यांना शक्ती प्रदर्शन करूंन मुंबईकरांचे टेन्शन वाढवण्याची अवदसा आठवली.शिवसेनेचे सोडा त्यांचा दरवर्षी दसरा मेळावा होतो पण शिंदे गटाचे काय? तुम्ही सत्ते मध्ये आहात तेंव्हा राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची काळजी घेण्याची जबाबदारी तुमची होती . पण शिवसेनेच्या विरोधात गेलेल्या लोकांना मुंबईत आणून वातावरण तापवणे .मुंबईच्या शांततेला डिस्टर्ब करणे…
गणेशोत्सवाशी निगडीत सर्व कामे वेळेवर पूर्ण करा – पालिका आयुक्तांचे सर्व अधिकाऱ्यांना आदेश
पावसामुळे मुंबई महानगरातील रस्त्यांवर झालेले खड्डे बुजवण्याची कार्यवाही वेगाने पूर्ण करण्यात येत असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. असे असले तरी, गणेशोत्सवाच्या कालावधीत कोणत्याही रस्त्यांवर खड्ड्यांमुळे अडथळा निर्माण होणार नाही, यासाठीची खातरजमा विभाग स्तरावर करण्याची करावी, रस्त्यावर खड्डे आढळल्यास मध्यवर्ती यंत्रणेशी समन्वय साधून खड्डे बुजवण्यासाठी युद्धपातळीवर काम हाती घेण्यात यावे, असे निर्देश वेलरासू यांनी दिले आहेत
भिवंडीत एक मजली इमारत कोसळली , एकाचा मृत्यू तर सात जण जखमी…
भिवंडी (आकाश गायकवाड ) शहरातील आजमी नगर येथील टिपू सुलतान चौक परिसरात असलेली एक मजली इमारत कोसळल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. या दुर्घटनेत एक जणाचा मृत्यू तर आठ जण जखमी झाले आहेत. रजाक ( वय अंदाजे ३५ ते ४० वर्ष ) असे दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. तर हसीम शेख ३५, सुबेदा…
गुजरात मध्ये बोट उलटून- १४ विध्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
वडोदरा -गुजरातमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. वडोदऱ्यातील हर्णी तलावात शाळकरी विद्यार्थ्यांनी भरलेली बोट उलटली आहे. या घटनेत दोन शिक्षक, १२ विद्यार्थ्यांसह १४ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर अग्निशमन दलाकडून तलावात शोधमोहीम सुरू आहे.२७ विद्यार्थ्यांची सहल हर्णी तलावात बोटिंगसाठी आली होती. बोटवरील एकाही जणानं सुरक्षेसाठी लाइफ जॅकेट घातलं नव्हतं. तलावात गेल्यानंतर विद्यार्थ्यांसह बोट उलटली. यात…
अहमदनगर रुग्णालय आगीच्या दुर्घटनेत मोठा खुलासा
अहमदनगर/ रुग्णालय प्रशासन सतर्क नसेल तर काय घडू शकते हे अहमदनगर रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे दिसून आले या रुग्णालयात आय सी यू विभागाला आग लागून ११जनचा मृत्यू झाला होता आता पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे एन या प्रकरणी शिवसेनेचे जिल्हा उप प्रमुखांनी एक मोठा खुलासा केला आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की आम्ही सार्वजनिक…
