: मुंबई – भाजपा नेते सध्या शिवसेनेच्या मागे हात धुवून लागले आहेत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब याना 100 कोटींच्या खंडणी प्रकरणात इडीच्या चौकशीला सामोरे जावे लागलेले असतानाच .आता तिकीट यंत्र खरेदी प्रकरणात गुरुवारी लोकायुक्त त्यांची चौकशी करणार आहेत . भाजप नेते मिहिर कोटेचा यांनी सदर प्रकरणी परब यांच्या विरोधात राज्यपाल कोशारी यांच्याकडे तक्रार केली होती .त्यात म्हटले होते की लॉकडाउन काळात आय टी क्षेत्रातील कंपन्यांची वाईट अवस्था झाली होती . त्यामुळे इलेक्ट्रानिक तिकीट यंत्र खरेदी निविदा प्रक्रियेतील एनवेळी बदल करण्याचे आदेश परब यांनी दिले होते . त्यानुसार कंत्राटदारच्या वार्षिक उलाढालीची 150 .कोटी वरुण 100 कोटींवर आणण्यात आली . त्याच बरोबर निविदेतील अटी आणि शर्तीमध्ये आणखी काही बदल करण्यात आले निविदां मधील शर्ती मधील बदल मंजुरीसाठी संचालक मंडळपुढे ठेवावेत अशी सूचना महाव्यवस्थापकांनी केली पण परिवहन मंत्र्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि अगोदर निविदा प्रप्र्सिद्ध करावी आणि नंतर तिला संचालक मंडळाची मंजूरी घ्यावी असे आदेश परिवहन मंत्र्यांनी दिले .मर्जीतील एका कंत्राटदारला काम देण्यात आले त्याचा परिवहन मंडळाला 250 कोटींचा भुर्दंड बसणार आहे . त्यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करावी अशी कोटेचा यांची मागणी आहे .
Similar Posts
राज्यपाल मिष्किलपणे – ‘मी देखील ऐंशी वर्षांचा आहे
महाराष्ट्राचे म राज्यपाल मा.भगतसिंह कोश्यारी यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षीय दालनास सदिच्छा भेट दिली . तेव्हा अध्यक्ष नरेंद्र विश्वनाथराव वाबळे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पत्रकार संघाविषयी राज्यपालांना माहिती देताना श्री.वाबळे म्हणाले की, ‘मुंबई मराठी पत्रकार संघ ही ऐंशी वर्षे जुनी संस्था आहे.’ त्यावर राज्यपाल मिष्किलपणे पटकन म्हणाले, ‘मी देखील ऐंशी वर्षांचा आहे.’…
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू
ठाणे/संपूर्ण महाराष्ट्राला घाबरवून टाकणाऱ्या बदलापूरच्या शाळेतील मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता ते ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ चार चे उपायुक्त डॉक्टर सुधाकर पठारे यांचा तेलंगणामध्ये रस्ते अपघातात मृत्यू झालाडॉक्टर सुधाकर पाठारे हे प्रशिक्षणासाठी तेलंगणाला गेले होते तेथील श्रीशैलम ज्योतिर्लिंग दर्शनासाठी पाठारे आणि त्यांचे नातेवाईक भगवंत खोडके दर्शनाला गेले होते तेथून परतत असताना…
म्हाडाच्या छाननीत २१७५ अर्ज अपात्र
मुंबई – म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील ४०८२ घरांच्या विक्रीकरिता सोडत पूर्व प्रक्रिया सुरु आहे. या प्रक्रियेत प्राप्त १,४५,८४९ अर्जांपैकी १,२०,१४४ अर्ज संगणकीय सोडतीत सहभागी होणार आहेत. यामार्फत अंदाजे ५१९ कोटी रुपयांच्या अनामत रकमेचा भरणा झाला आहे. तर २१७५ अर्ज या प्रक्रियेत अपात्र ठरले आहेत.या अपात्र अर्जदारांना अनामत रकमेचा परतावा तातडीने करण्यात येईल अशी माहिती म्हाडाने…
संदीप बाळासाहेब बर्गे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन
मुंबई/ मुंबई जनसत्ता साप्ताहिक आणि न्यूज पोर्टल चे संपादक किसनराव जाधव यांचे मेव्हणे संदीप बाळासाहेब बर्गे यांचे २७ जानेवारी रोजी वयाच्या ३५ वया वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले ते बेस्ट विभागात कामाला होते.अत्यंत शांत आणि मनमिळाऊ स्वभावाचे असलेले संदीप बर्गे यांचं अत्यंत कमी वयात निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या पश्चात…
जिल्हा बँक घोटाळ्या प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार याना ५ वर्षांची शिक्षा
नागपूर – बहुचर्चित नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रोखे घोटाळा खटल्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा बँक घोटाळ्यात बँकेचे तत्कालीन अध्यक्ष आणि काँग्रेस आमदार सुनील केदार यांच्यासह पाचजण दोषी आढळले आहेत. या घोटाळ्याप्रकरणी नागपूर खंडपीठाने सुनील केदार यांना 5 वर्ष शिक्षा आणि 12.5 लाखांचा दंड ठोठावला आहे. तर या घोटाळ्याप्रकरणी तिघांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता…
मराठा आरक्षण वातावरण तापले फडणवीसवर गंभीर आरोप करून जरांगे मुंबैला रवाना
जालना – आम्ही २४ तारखेला शांततेत आंदोलन केले, तरीही सरसकट गुन्हे दाखल करण्यात आले. मराठा आंदोलकांविरोधात पोलिसांचा वापर केला जातोय. न्यायालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुणरत्न सदावर्तेंना पुढं केलं. पहिल्यांदाही तोच होता 13 टक्के आरक्षण रद्द करायला. मागील आठवड्यात सदावर्तेंनी याचिका दाखल केली आणि देवेंद्र फडणवीसांनी तिथे सरकारी वकिलाला पाठवून हस्तक्षेप केला, असे आरोप मराठा…
