मुंबई -आम्ही हिंदूंच्या सनाविरुद्ध आहोत असा कांगावा करून दहीहंडीसाठी आंदोलन करणार्यांना हे कळलं हवे होते की दहीहंडी म्हणजे काही स्वांतत्र्य युद्ध नाही की जे मिळायलाच हवे असे नाही आणि आदोंलणेच करायची असतील तर कोरोंनाच्या विरूढ आंदोलन करा . यात्रा काढून आणि बोंबलून जन आशीर्वाद मिळणार नाही अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे व भाजपला सुनावले आहे . ठाण्याच्या संस्कृती युवा प्रतिष्ठाणच्या वतीने ऑक्सीजन प्लांटचे लोकपर्ण ऑन लाइन पद्धतीने करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री बोलत होते .यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ,संजय राऊत रवींद्र फाटक ,महापौर नरेश म्हसके आणि संस्कृती प्रतिष्ठानचे आमदार प्रताप सरनाईक उपस्थित होते . मुख्यमंत्री ठाकरे यांनी दहीहंडीसाठी आंदोलन करणार्यांना खडे बोल सुनावत संगितले की गणेशोत्सव आणि दहीहंडी सारखे उत्सव साजरे करताना काळजी घ्या गर्दी व्हायला देऊ नका असे आम्हाला केंद्रानेच पत्र पाठवले आहे .त्याचे आम्ही पालन करतोय .शिवसेना 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या धोरणाला सुरूवातीपासून बांधील आहे .म्हणूनच आम्ही समाज कारणाला अधिक महत्व देतो .टास्क फोर्स आणि इतर तज्ञ तिसर्या लाटेचा धोका आहे असे सांगत असताना जे लोक यात्रा करून गर्दी जमवत आहेत .त्यांना फक्त राजकारण कारचे आहे असेही ते म्हणाले .
Similar Posts
राज्यात घाणेरड्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनीच केली – राज ठाकरे
मुंबई – राज्यात झालेल्या सत्तानाट्यानंतर राज ठाकरे यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. राज्यात जे काही झालं ते किळसवाणं आहे. राज्यात घाणेरड्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनीच केली असल्याचं ते म्हणाले. ते पुण्यात बोलत होते. जनमताचा कौल तुम्ही घेतला तर प्रत्येक घरामध्ये शिव्या ऐकायला येतील दुसरे काही ऐकायला येणार नाही, असं म्हणत त्यांनी राज्यातील सत्तानाट्यावर संताप…
ताज्या बातम्या | मनोरंजन | महाराष्ट्र | मुंबई“काश्मिर फाइल्स” इतिहास घडवणार !!!
19 जानेवारी 1990 रोजी काश्मिरी दहशतवाद्यांनी अत्याचार करून लाखो काश्मिरी हिंदूंना अर्थातच काश्मिरी पंडितांना त्यांचे घरदार सोडायला भाग पाडले होते. त्या घटनेने काश्मिरी पंडित काश्मिरी खोऱ्यातून इतिहासजमा झाले होते. पण आज काश्मिरी पंडितांची तीच “शोकांतिका” “काश्मीर फाइल्स” च्या रूपाने सिनेमागृहात इतिहास घडवत आहे. अभूतपूर्व इतिहास घडवणार आहे. कोणतीही पूर्वप्रसिद्धी न करता अवघ्या 650 सिनेमांगृहांमधे प्रदर्शित…
विरोधी पक्षाच्या १४६ खासदारांचे निलंबन मागे
नवी दिल्ली : संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवरून गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षांच्या निलंबित १४६ खासदारांना बुधवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाग घेता येणार आहे. गेल्या अधिवेशनात विक्रमी संख्येने १४६ खासदार निलंबित झाले होते. त्यापैकी मागील अधिवेशनाच्या काळापुरते निलंबित झालेल्या खासदारांना उद्यापासून अधिवेशनात सहभागी होता येणार आहे. उर्वरित 11 राज्यसभा खासदारांना विशेषाधिकार समितीने दोषी ठरल्याची माहिती आहे. परंतु…
मुंबईकरांनो सावधान!वसई विरार मधील अनधिकृत घरांची मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये जाहिरातबाजी
. मुंबई/सध्या मुंबई आणि आसपासच्या परिसराचे झपाट्याने औद्योगीकरण होत असल्याने, मुंबई लगतच्या वसई, विरार, कल्याण, डोंबवली, नवी मुंबई ,पनवेल आधी भागांतील जमिनींना सोन्याचे भाव आलेले आहेत .याचाच फायदा काही भूमाफिया घेत आहेत.वसई विरार मधील नायगाव, वसई आणि नाला सोपारा परिसरात काही चाळ माफीयांनी बेकायदेशीर चाळी बांधल्या आहेत. तसेच काही इमारती उभ्या केल्या आहे. आणि त्याची…
डिसेंबर अखेर राज्यात दीड लाख नोकऱ्या- मुख्यमंत्र्यांची ग्वाही
मुंबई/ आश्वासने द्यायला पैसे लागत नाहीत आणि दिलेली आश्वासने पूर्ण करायला हवीत असाही काही नियम नाही.त्यामुळे राज्यकर्ते आश्वासनांची खैरात करीत आहेत .महाराष्ट्राच्या तिजोरीत भलेही छादम नसला तरी सरकारकडून आश्वासने देण्याचा सिलसिला काही थांबायला तयार नाही .शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून आश्र्वनांचा पावूस पडतो आहे.मोठमोठ्या प्रकल्पांची घोषणा केली जातेय आताही मुख्यमंत्री शिंदे यांनी डिसेंबर पर्यंत दीड…
एकनाथ शिंदे यांना नारायण राणेंची ऑफर
मुंबई/ एकनाथ शिंदे हे शिवसेनेत कंटाळले असून तसे असेल तर त्यांनी भाजप मध्ये यावे इथे त्यांचा योग्य तो मान राखला जाईल अशी ऑफर केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी एकनाथ शिंदे यांना दिली आहेनारायण राणे हे जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने सध्या मुंबई आणि कोकण दौर्यावर आहेत. नाला सोपारा येथे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की एकनाथ शिंदे…
