..
पुणे/राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इशारा दिल्यानंतर आज अजित पवार यांनी या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलं आहे. “प्रत्येकाला पान चाळण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. तो अधिकार त्यांनी वापरावा. माझी भूमिका मांडताना ते त्यांची भूमिका मांडतील,” असं अजित पवार म्हणाले. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा एकदा इशारा दिला. मागची पाने पलटवली तर अजित पवारांनाही बोलता येणार नाही. तसेच ७०हजार कोटींचे प्रकरण अजून न्यायप्रविष्ठ असल्याचादेखील इशारा बावनकुळे यांनी दिला. त्यांच्या या इशाऱ्यावर अजित पवारांनी थोडक्यात उत्तर दिलं.
उमेदवारांची बैठक घेतली असून त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आहे. एकोप्याने प्रचार करा, बोलताना काळजी घ्या, कुणाला ठेच लागेल असं बोलू नका, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत”, असं अजित पवारयांनी सांगितलं.महायुती म्हणून राज्यात आणि केंद्रात आम्ही सोबत आहोत. मात्र महानगरपालिकेच्या निवडणुका आम्ही वेगवेगळ्या लढत आहोत. गेल्या नऊ वर्षांत पिंपरी–चिंचवडची काय अवस्था झाली आहे, हे सर्वांना माहिती आहे. महानगरपालिकेशी संबंधित मुद्द्यांवरच बोललं पाहिजे. भाजपच्या काळात महानगरपालिका कर्जबाजारी झाली असून नियोजनशून्य कारभार झाला आहे. २५ वर्षांत आम्ही शहरात अनेक नवनवीन गोष्टी आणल्या आहेत,” असा आरोपही त्यांनी केला.

