मुंबई/मत चोरी आणि मतदान याद्यांमध्ये असलेला घोळ यावर निवडणूक आयोग काय उत्तर देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते मात्र पत्रकार परिषदेत याबाबत बोलताना राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे बोट दाखवले.विरोधकांचे आक्षेप आक्षेप आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवले आहेत पण त्यांनी अजून प्रतिसाद दिलेला नाही असे म्हणत यातून राज्य निवडणूक आयोगाने हात झटकले. दरम्यान आज निवडणूक आयोगाने नगर
राज्य निवडणूक आयोगाची आज २४६ नगर परिषद आणि ४२ नगरपंचायत यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.त्यानुसार २ डिसेंबरला निवडणूक तर ३डिसेंबरला निकाल जाहीर होईल. आज राज्य निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी राज्यातील २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या सर्व नगर परिषदा आणि नगर पंतायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे आणि 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. यानंतर राज्य निवडणूक आुक्तांना पत्रकारांनी विविध प्रश्न विचारले ज्यामुळे त्यांची कोंडी होताना दिसली. पण त्यांनी सर्व प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. राज्यातील मनसे आणि मविआच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन मतदारयाद्यांमधील घोळबाबत माहिती दिली होती. त्याबाबत काय कारवाई केली? असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला. त्यावर त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला आपण याबाबत माहिती दिली. पण केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नंतर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिले.
विरोधकांचा आरोप आहे की, निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत आहे. त्याबाबत काय सांगाल? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर निवडणूक आयुक्तांनी उत्तर दिलं. हे चुकीचं आहे. असं निवडणूक आयोग कुणाच्या दबावाखाली काम करत नाही, असं राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले.पत्रकारांचे प्रश्न : विरोधकांचे आक्षेप आहेत की, एका घरामध्ये ४० पेक्षा जास्त मतदार नोंदले गेले आहेत. चुकीचे पत्ते आहेत. ते दुरुस्ती करण्यासाठी काय पावलं उचलणार? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर निवडणूक आयुक्तांनी उत्तर दिलं.
आयुक्तांचं उत्तर : आम्हाला मतदार यादी ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मिळते. या यादीत दुबार आणि तिबार मतदानाबद्दल कारवाई करता येते. ती कारवाई आम्ही केली आहे. काही मिस्टेक असतील त्या आम्ही दुरुस्त केले आहेत. प्रभाग चुकला असेल तर ते सुद्धा आम्ही दुरुस्त करत आहोत. विधानसभेच्या मतदार यादीत नाव आहे, पण या मतदार यादीत नाही. तर ते सुद्धा नाव आम्ही टाकतोय, असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिलं.प्रश्न: विरोधकांचे मतदान होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. त्यावर काय सांगाल?
उत्तर : मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आम्ही कॅम्पेन करत आहोत. आमच्या स्तरावर जेवढी मतदार यादी स्वच्छ करता येईल त्या पद्धतीने आम्ही कारवाई करत आहोत. जिथे एका घरावर जास्त मतदार दाखवले आहेत त्यावर केंद्रीय निवडणूर आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहेप्रश्न : पैसै वाटप, मद्य वाटप रोखण्यासाठी काय करणार?
उत्तर : आम्ही आचारसंहितेची ऑर्डर काढली आहे. त्यामध्ये मद्य आणि पैशांचे वाटपबाबत आदेश दिले आहेत. सर्व बँका, पतपेढ्या यांच्या व्यवहारावर पूर्ण लक्ष दिलं जाणार आहे. विविध प्रकारच्या विमानळ, पोर्टसाठी उपाययोजना केले जात आहेत
सर्वपक्षीय शिष्टमंडळाने भेट घेतली होती. त्यांनी काही मागण्या करत निवेदन दिलं होतं. त्याबाबत काय कारवाई केली?
उत्तर : सर्वपक्षीय शिष्टमंडळाने माझी भेट घेतली होती. त्यावेळेस त्यांनी ज्या मागण्या केल्या त्या हिशोबाने मी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे १ जुलै ते १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंतच्या मतदार यादी मागितली आहे. मात्र त्याबाबत कुठल्याही प्रकारचं संभाषण केंद्रीय निवडणूक आयोगासोबत झालेलं नाही. सर्वपक्षीय बैठकीबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना केंद्रीय निवडणूक आयोगाकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही.

