मुंबई/ दुबार तेवत मतदान. करताना कुणी आढळल्याचं त्याला तिथल्या तिथे चोप द्या असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी आयोजित केलेल्या सत्याचा मोर्चा दरम्यान कार्यकर्त्यांना दिले.तर सर्व साक्ष पुरावे घेऊन आम्ही निवडणूक आयोगाच्या विरुद्ध न्यायालयात जाणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले. विरोधकांकडून शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या सत्याच्या मोर्चाला प्रचंड यश मिळाली.या मोर्चात तुफान गर्दी लोटली होती
मतदारयादीतील घोळ आणि मतचोरी विरोधात आज (1 नोव्हेंबर) मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एकत्रित रस्त्यावर उतरले होते. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, किसान सभेचे नेते अजित नवले उपस्थित होते. त्याचबरोबर अनेक संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी देखील मतचोरीच्या विरोधात आज मोर्चा काढला. या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी सत्ताधारी भाजपने देखील आज मूक आंदोलन केलं होतं. या दोन्ही आंदोलनाच्या संदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे.
विरोधकांनी आज जो मतचोरीच्या विरोधात सत्याच्या मोर्चा काढला होता, त्या प्रकरणी त्यांच्या गुन्हा दाखल होणार आहे. या प्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल होणार असल्यावही माहिती मिळाली आहे.
तसेच भाजपने देखील विरोधकांच्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी आज मुकमोर्चा आंदोलन केलं होतं. त्यांच्या विरोधतही गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे. कारण, परवानगीशिवाय मोर्चा आणि आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल होणार आहे. आझाद मैदान पोलीस ठाणे आणि झोन 2 मध्ये डी बी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होणार आहे.सत्याच्या मोर्चा मध्ये राज ठाकरे यांनी कुठे आणि कसे दुबार मतदान झाले याचे पुरावे सादर केले. १जुलै २०२५ च्या तारखेनुसार उत्तर मुंबईत 1१७३९४५६ यातील ६२३७० दुबार मतदार आहेत. राज ठाकरे यांनी मुंबईतील लोकसभा मतदारसंघात किती दुबार मतदार आहेत याची माहिती दिली. मुंबई उत्तर पश्चिम ६०२३१,मुंबई उत्तर पूर्व मध्ये ९२९८३ दुबार मतदार, मुंबई उत्तर मध्ये ६३७४० दुबार मतदार, मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात ५०५६५, दक्षिण मुंबईत ५५२०५, नाशिक लोकसभा मतदारसंघात ९९६७३ दुबार आणि मावळ १४५६३६ दुबार मतदार आहेत. दुबार मतदार म्हणत राज ठाकरेंनी कागदपत्रांच्या डोंगर दाखवला. राज ठाकरे यांनी याला निवडणुका म्हणतात का? असा सवाल केला. यातून लोकशाही टिकेल का असा सवाल त्यांनी केला. आमदार सांगतो २० हजार मतं बाहेरून आणली.नवी मुंबईत आयुक्तांच्या बंगल्यावर मतदार नोंदवले गेले. शौचालयात मतदार नोंदवले गेले ही लाजिरवाणी गोष्ट सुरु आहे. मशीन्स च डेमन्स्टार्शन केलं आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत २३२ आमदार विजयी होऊनही राज्यभर शांतता होती. सगळ्यांना जर प्रश्न असेल निवडून आलेल्यांना देखील प्रश्न पडला होता. हा सगळं प्रकार निवडणूक आयोगांमार्फत सुरू आहे. हा मतदारांचा अपमान नाही का? त्यांच्या मताला काय किंमत आहे, असा सवाल राज ठाकरेंनी केला.या मोर्चात शिवसेना,मनसे,राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस,कम्युनिस्ट शेकाप आदी पक्षांचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.आता उद्धव ठाकरे २ दिवसात या सर्व पुराव्यानिशी न्यायालयात खटला दाखल करणार आहेत.

