सरकार असो की विरोधी पक्ष या लोकांना जनतेच्या प्रति त्यांची असलेली जबाबदारी कधी कळणार?
भारतीय लोकशाहीत आता सर्वसामान्य माणसाला फारशी किंमत राहिलेली नाही कारण राजकारण आणि राजकीय पक्ष याचे पूर्णपणे व्यावसायिकरण झालेले आहे त्यामुळे सामान्य माणूस केवळ निवडणुकीत मतदान करण्या पुरताच उरला आहे.लोकांच्या प्रश्नांची कुणाला काहीही पडलेली नाही आता हेच बघान राज्यात विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे विधिमंडळात अर्थसंकल्प मांडला आहे त्यावर चर्चा करायची सोडून विरोधी पक्ष रस्त्यावर उतरून…
