घाटकोपर ता 31 , बातमीदार-डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण रेवदंडा यांच्या माध्यमातून सोमवार पासून पूरग्रस्त भागात स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत महाड , पोलादपूर व चिपळून या ठिकाणी दररोज 1500 हुन अधिक श्रीसदस्य विविध ठिकाणाहून स्वच्छता अभियानात सामील होत आहेत. महाड मध्ये पाण्याचा प्रवाह शिरल्याने गाळ , माती , चिखल , कचरा , वाहने , घरातील वस्तू , किराणा दुकानातील माल हा वस्तीत व रस्त्यावर पसरलेला आहे. या सर्व वस्तू उचलण्यापासून ते रस्त्यावरती साचलेला गाळ यांची विल्हेवाट लावण्यासाठी पूरग्रस्त भागामध्ये स्वच्छता अभियानाचे नियोजन प्रतिष्ठाणचे अध्यक्ष डॉ श्री आप्पासाहेब धर्माधिकारी (पद्मश्री पुरस्कार सन्मानित ) तसेच प्रतिष्ठाणचे विश्वस्त रायगड भूषण श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. महाड येथील पूरग्रस्त भागात महाड जिल्हा परिषद शाळा , ग्रामपंचायत , आयटीआय , रुरल हॉस्पिटल समोरील ट्रामा केअर सेंटर , महाड एसटी स्थानक , बिरवाडी , चवदार तळे , आंबेडकर स्मारक आदी ठिकाणी मुंबई उपनगरातून आलेल्या श्रीसदस्यांनी स्वच्छता केली. या मोहिमेत प्रतिष्ठाणचे श्रीसदस्य स्वतःचा जेवणाचा डबा , पाण्याची बॉटल , तसेच सॅनिटायझर , मास्क यांचा वापर करत पूरग्रस्त भागात स्वच्छतेचे काम करत आहेत. डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण रेवदंडा मार्फत सातत्याने समाजउपयोगी उपक्रम राबविले जातात. त्यात प्रामुख्याने वृक्ष लागवड आणि त्याचे संवर्धन , आरोग्य शिबीर , रक्तदान शिबीर , दाखले वाटप , शैक्षणिक साहित्य वाटप , अंध व मुखबधिर विद्यार्थाना मदत , उद्योजकता व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिर , पाणपोई बसथांबे , आपतग्रस्तांना मदत यासारखे अनेक उपक्रम राबविले जातात. 20 जुलैच्या महापुराने झालेली अस्वच्छता संपूर्ण स्वच्छ करण्यासाठी प्रतिष्ठाणने नियोजन केले आहे. या अभियानासाठी महाड नगर परिषद पोलादपूर व चिपळूण प्रशासनाने सहकार्य केले आहे. प्रतिष्ठाणचे हे स्वच्छता अभियान पूरग्रस्त भाग पूर्णपणे स्वच्छ होई पर्यंत सुरूच राहणार आहे.
Similar Posts
आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केली भीती दिवाळी नंतर करोना वाढण्याची शक्यता
मुंबई/ एकीकडे अनलॉक प्रक्रिये अंतर्गत सर्व काही हळू हळू सुरू होत असतानाच दिवाळी नंतर कोरोना वाढण्याची शक्यता आहे अशी भीती खुद्द आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीच व्यक्त केल्यामुळे राज्यात संभ्रमाचे वातावरण आहे मात्र जमेची बाजू म्हणजे तिसऱ्या लाटेची शक्यता आरोग्य मंत्र्यांनी फेटाळून लावली आहे हा एक दीलासाच म्हणावा लागेलकरोनाचा प्रादुर्भाव आता बऱ्यापैकी कमी झालंय नवे…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराजेंना घेरण्याचा प्रयत्न
राज्यसभेच्या सह जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते संभाजी राजे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक संभाजी राजांवर सगळ्यांचाच राग आहे त्यांच्या मागे मोठ्या संख्येने मराठा समाज आहे आणि या मराठा समाजाने हिंदुत्वाच्या लढाईत कधीही सक्रिय होण्याचा प्रयत्न केला नाही किंवा आपली ताकत हिंदुत्वासाठी लढणाऱ्या भुरट्या हिंदुत्ववाद्यांच्या मागे उभी केली नाही…
‘सत्यमेव जयते
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर अटकेत असलेल्या नारायण राणे यांना मंगळवारी रात्री उशिरा कोर्टाने जामीन मंजूर केला. यानंतर नारायण राणे पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला . तरी फार बोलणं टाळत केवळ ‘सत्यमेव जयते’ असं म्हटलं आहे.
इकबाल सिंग चहल याना केंद्रात प्रमोशन
मुंबई/ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अत्यंत विश्वासातील अधिकारी अशी ओळख आलेले मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांची आता केंद्रात सचिवपदी नियुक्ती होणार आहे कोविड काळात चहल यांनी केलेल्या कामाची संपूर्ण देशाने दाखल घेतली होती त्यामुळे त्यांना केंद्राच्या अपाईटमेंट कमिटीने केंद्रात सचिव पदी बढती दिली आहे एकूण 9 अधिकाऱ्यांचे देशभरातील राज्या मधून केंद्रात प्रमोशन झाले आहे…
मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली- चंद्रकांत खैरेंचा गौप्यस्फोट
संभाजी नगर – राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू आहे. मात्र शिंदे गटाकडून सरकार स्थिर असून, मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे हेच राहणार असल्यचं सांगण्यात येत आहे. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी यावरून एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सरकारचे कमी दिवस उरले आहेत, भाजपकडून मुख्यमंत्री बदलासाठी चाचपणी सुरू असल्याचा गौप्यस्फोट चंद्रकांत खैरे…
सिध्देश शर्मा, प्रणिता सोमण कर्णधार
शर्मा, प्रणिता सोमण कर्णधार१८वी राष्ट्रीय एमटीबी सायकलींग अजिंक्यपद स्पर्धा : महाराष्ट्र संघ घोषित; आळंदी येथे रंगणार थरार पुणे : ठाण्याचा सिध्देश शर्मा व प्रणिता सोमण यांच्याकडे १८ व्या राष्ट्रीय एमटीबी सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी अनुक्रमे पुरूष व महिला गटात महाराष्ट्र संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. ही स्पर्धा पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे २९ व ३० आॅक्टोबर दरम्यान…
