घाटकोपर ता 31 , बातमीदार-डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण रेवदंडा यांच्या माध्यमातून सोमवार पासून पूरग्रस्त भागात स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत महाड , पोलादपूर व चिपळून या ठिकाणी दररोज 1500 हुन अधिक श्रीसदस्य विविध ठिकाणाहून स्वच्छता अभियानात सामील होत आहेत. महाड मध्ये पाण्याचा प्रवाह शिरल्याने गाळ , माती , चिखल , कचरा , वाहने , घरातील वस्तू , किराणा दुकानातील माल हा वस्तीत व रस्त्यावर पसरलेला आहे. या सर्व वस्तू उचलण्यापासून ते रस्त्यावरती साचलेला गाळ यांची विल्हेवाट लावण्यासाठी पूरग्रस्त भागामध्ये स्वच्छता अभियानाचे नियोजन प्रतिष्ठाणचे अध्यक्ष डॉ श्री आप्पासाहेब धर्माधिकारी (पद्मश्री पुरस्कार सन्मानित ) तसेच प्रतिष्ठाणचे विश्वस्त रायगड भूषण श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. महाड येथील पूरग्रस्त भागात महाड जिल्हा परिषद शाळा , ग्रामपंचायत , आयटीआय , रुरल हॉस्पिटल समोरील ट्रामा केअर सेंटर , महाड एसटी स्थानक , बिरवाडी , चवदार तळे , आंबेडकर स्मारक आदी ठिकाणी मुंबई उपनगरातून आलेल्या श्रीसदस्यांनी स्वच्छता केली. या मोहिमेत प्रतिष्ठाणचे श्रीसदस्य स्वतःचा जेवणाचा डबा , पाण्याची बॉटल , तसेच सॅनिटायझर , मास्क यांचा वापर करत पूरग्रस्त भागात स्वच्छतेचे काम करत आहेत. डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण रेवदंडा मार्फत सातत्याने समाजउपयोगी उपक्रम राबविले जातात. त्यात प्रामुख्याने वृक्ष लागवड आणि त्याचे संवर्धन , आरोग्य शिबीर , रक्तदान शिबीर , दाखले वाटप , शैक्षणिक साहित्य वाटप , अंध व मुखबधिर विद्यार्थाना मदत , उद्योजकता व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिर , पाणपोई बसथांबे , आपतग्रस्तांना मदत यासारखे अनेक उपक्रम राबविले जातात. 20 जुलैच्या महापुराने झालेली अस्वच्छता संपूर्ण स्वच्छ करण्यासाठी प्रतिष्ठाणने नियोजन केले आहे. या अभियानासाठी महाड नगर परिषद पोलादपूर व चिपळूण प्रशासनाने सहकार्य केले आहे. प्रतिष्ठाणचे हे स्वच्छता अभियान पूरग्रस्त भाग पूर्णपणे स्वच्छ होई पर्यंत सुरूच राहणार आहे.
Similar Posts
मुंबईत पुन्हा अग्नी तांडव कमला इमारतीला लागलेल्या आगीत ७ जणांचा मृत्यू १५ जखमी
मुंबई / करी रोड येथे इमारतीला लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच काल भाटिया हॉस्पिटल लगतच्या कमला इमारती मधील १८ वया मजल्यावर भीषण आग लागून ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला तर १५ जन जखमी असून त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे अग्निशमन दलाच्या १२ गाड्यांनी ही आग विझवण्यासाठी अग्नी शमन दलाच्या १२ बंबांनी प्रयत्नांची शिकस्त करून आग…
प्रभाग रचणे बाबत मुंबईकरांना शेवटच्या दिवशी जाग सोमवारी एकाच दिवशी४५४ हरकती व सूचना
मुंबई/ पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई मध्ये जे ९ वॉर्ड वाढवण्यात आले आहेत त्यासाठी prbhag पुनर्रचना करण्यात आली आहे त्यावर 1 ते 14 फेब्रुवारी दरम्यान हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या मात्र १ ते १३ या कालावधीत केवळ ३५८ इतक्याच हरकती व सूचना आल्या होत्या मात्र शेवटच्या दिवशी म्हणजे 14 फेब्रुवारीला मुंबईकरांना जाग आली असून एकाच…
पेट्रोल डिझेल आणखी स्वस्त होणार- राज्याने ही व्हट कमी केला
मुंबई केंद्राने उत्पादन शुल्कात मोठी कपात केल्याने पेट्रोल डिझेल काही प्रमाणात स्वस्त झाले होते त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारनेही मूल्यवर्धित करत कपात केली आहे त्यामुळे पेट्रोल 2.80 पैशाने तर डिझेल 1.44 पैशांनी स्वस्त होणार आहे त्यामुळे राज्याला 2500 कोटींचा फटका बसणार आहेकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोल डिझेलच्या उत्पादन शुल्क मोठी कपात केली त्यामुळे डिझेल 9.50…
पालिका अधिकारी संजय जयस्वाल यांची अकरा तास ईडी कडून चौकशी
मुंबई/कोविड घोटाळ्यात महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त व म्हाडाचे बडे अधिकारी संजीव जैस्वाल त्याचबरोबर कंत्राटदार आणि मध्यस्थी यांचे आता दिवस भरलेले आहेत कारण त्यांच्या ईडीने संपत्तीचा पंचनामा करायला सुरुवात केली आहे . संजीव जयस्वाल आणि इतर लोकांच्या घरावर ईडीने छापे टाकले होते या छाप्यानंतर संजीव जयस्वाल यांची ११ तास इडीने चौकशी केली या छाप्यात संजीव जयस्वाल…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमहागाईच्या विरोधात काँग्रेसचे जेलभरो आंदोलन
मुंबई/ सोनिया आणि राहुल गांधींच्या विरोधात ई डी कडून सुरू असलेल्या कारवाई मुळे काँग्रेस संतप्त झाली आहे.त्यामुळे आता काँग्रेसने महागाईच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे काँग्रेस या प्रश्नावर राज्य व्यापी आंदोलन करणार असून शुक्रवारी राजभवनाला घेराव घालणार आहेतकाँग्रेसने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की केंद्रातील भाजपा सरकारच्या मनमानी कारभारामुळे देशात…
रविवारी मध्य रेल्वेवर १८ तासांचा मेघा ब्लॉक
मुंबई/ मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम हाती घेण्यात आलेले असल्याने रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून ते सोमवारी पहाटे २वाजेपर्यंत मध्य रेल्वेवर मेेेेेेगाा ब्लॉक घेण्यात आला असून या कालावधीत लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत .तसेच लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत तसेच धीम्या मार्गावरील वाहतूक बंद राहील सर्व गाड्या जलद मार्गावरून जातील…
