माध्यमांवरील कॉर्पोरेट कंट्रोल कमी व्हावा : पृथ्वीराज चव्हाण
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांवरील कॉर्पोरेट कंट्रोल कमी व्हावा अशी मागणी केली. ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांच्या ‘कटाक्ष’ या लेखसंग्रहाचे लोकार्पण करताना ते बोलत होते. व्यासपीठावर माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी खासदार व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ‘देशोन्नती’चे मालक-संपादक प्रकाश पोहरे, माजी न्यायमूर्ती द्वय सत्यरंजन धर्माधिकारी व साधना…
