नियोजित सी लिंक मुळे अलीबागच्या विकासाला कलाटणी मिळणार
मुंबई-करंजा-रेवस सी-लिंकची ४० वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या कामासाठी ९०० कोटींची निविदा काढली आहे. त्यामुळे त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. या सी-लिंकमुळे नवी मुंबई ते आलिबाग यांच्यातील अंतर ४० किलोमीटरने कमी होणार आहे. त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे.राज्याचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी रेवस-रेड्डी या सागरी मार्गाची…
