ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

त्यांना भाजपा सोबत जायचे होतेउद्धव ठाकरेंची ताटकरेंकडून पोलखोल

मुंबई – राजकारणात कधी कोणाची कोणाकडून पोलखोल केली जाईल याचा नेम नाही . आज राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी चक्क उद्धव ठाकरे व त्यांचे सहकारी संजय राऊत यांची पोलखोल केली . उद्धव ठाकरेंना भाजपासोबत जायचे होते असा गौप्यस्फोट तटकरेंनी केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे

‘उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले, त्यावेळी ते चलबिचल झाले होते. त्याचवेळी ते भाजपसोबत जाण्याच्या विचारात होते, असा दावा सुनील तटकरे यांनी केला. संजय राऊतांनीच त्याबाबत एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या उपस्थितीत मला ही माहिती दिली होती’, असं तटकरे म्हणाले.
‘सामना अग्रलेखात अजित पवार यांच्यावर टीका केली. मागील 2 महिने सातत्यानं संजय राऊत बोलत आहेत. त्यांचा पक्षांतर्गत जे काही बोलायचं आहे ते बोलावं. परंतु आमच्यावर टीका करू नये. अजित पवार यांचा सिंचनदादा म्हणून उल्लेख करत आहेत. संजय राऊत माझ्याशी याआधी देखील बोलत होते. त्यावेळी त्यांच्या प्रशासकीय कामाबाबत बोलायचे. अजित पवार चांगले काम करतात असं म्हणायचे’, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं.
उद्धव ठाकरे यांनी वाईट वाटून घेऊ नये. दिल्लीत पंतप्रधानांची भेट उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. त्यावेळी अजित पवार गेले नव्हते म्हणून उद्धव ठाकरेंना राग आला होता. एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांना संजय राऊत म्हणत होते की पंतप्रधान यांच्यासोबत भेट झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या मनाची चलबिचल झाली होती. त्यांच्या मनात पुन्हा भाजपसोबत जावं असं होतं, असं राऊतांनी आम्हाला सांगितलं होतं. त्यांनी माझ्यावर देखील अनेकवेळा टीका केली होती. संजय राऊत यांनी शरद पवार आजारी असताना ३ ते ४ महिने उद्धव ठाकरे भेटायला गेले नव्हते, याबाबत नाराजी माझ्याकडे व्यक्त केली होती

error: Content is protected !!