ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबईराजकीय

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध करीत शिवसैनिकांनी केला गुन्हा दाखल


ठाणे, दि. 24 : मुख्यमंत्री हे घटनात्मक पद असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राजशिष्टाचाराचा अवमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र असून या महाराष्ट्राचे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याबद्दल अपशब्द वापरुन नारायण राणे यांनी मराठी अस्म‍ितेचा अपमान केला आहे. त्याचे हे बेताल वक्तव्य जनतेमध्ये तेढ निर्माण करणारे असून याचा निषेध व्यक्त करीत नारायण राणे यांच्या विरोधात ठाण्यातील शिवसैनिकांनी आंदोलन करून नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख व ठाणे शहराचे महापौर नरेश म्हस्के यांनी दिली
.
सोमवारी (23 ऑगस्ट) महाड येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर व्देषापोटी बेताल वक्तव्य केले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात याचा निषेध व्यक्त केला जात आहे. शिवसेना ठाणे‍ जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी नौपाडा पोलीस ठाण्यात नारायण राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल करुन घटनात्मक पदाचा अवमान केल्याबद्दल त्यांना तातडीने अटक व्हावी अशी मागणी करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे आदरणीय व्यक्तिमत्व आहे. मुख्यमंत्र्यांचा अवमान कधीही सर्वसामान्य नागरिक कधीही सहन करणार नाही. केवळ वैयक्तिक द्वेषापोटी केलेल्या या वक्तव्यामुळे लोकांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे, तसेच समाजात शत्रुत्व व दुष्टपणाची भावना निर्माण होईल. नारायण राणे यांच्या विधानांमुळे मुख्यमंत्री कुठलेही काम करीत असताना सामान्य नागरिक देखील त्यांचेवर बलप्रयोग करण्यास प्रवृत्त होतील अशीही शक्यता आहे. किंबहुना शिवसेना भाजपामधील कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष निर्माण होवू शकतो. ठाण्यामध्ये संघर्ष व तणावाचे वातावरण निर्माण होवू नये तसेच त्यांच्या वक्तव्यामुळे राजशिष्टाचाराचा भंग झाला असल्याने आम्ही गुन्हा दाखल करीत असल्याचे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी सांगितले. यावेळी ठाण्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर जाब विचारण्यासाठी शिवसैनिकांचा मोर्चा घोषणा देत जात असतानाच पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी मोर्चा अडविला, यावेळी शिवसैनिकांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, त्यानंतर पोलीसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर शिवसैनिकांनी संयमानी हा मोर्चा विसर्जित केला.
यावेळी खासदार राजन विचारे, शिवसेना महिला आघाडीच्या ठाणे जिल्हा संघटक मिनाक्षी शिंदे, उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, ठाणे शहरप्रमुख रमेश वैती, ठाणे विधानसभा संघटक हेमंत पवार, नगरसेवक राम रेपाळे, दशरथ पालांडे, सुधीर कोकाटे, एकनाथ भोईर, योगेश जानकर, गुरूमुख सिंग स्यान, संतोष वडवले, परिवहन समिती सभापती विलास जोशी, राजेश मोरे, घनश्याम कणसे, शिवसेना उपशहरप्रमुख जगदीश थोरात युवा सेना विस्तारक राहुल लोंढे, विराज म्हामुणकर, उपविभागप्रमुख पवन कदम, अमित जयस्वाल, महिला आघाडीच्या स्म‍िता इंदुलकर, वंदना डोंगरे तसेच ठाण्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!