हिंदीच्या मुद्द्यावरून महायुतीत मतभेद
मुंबई/हिंदीवरून महायुती सरकारमध्ये मतभेद पाहायला मिळत आहेत. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची भूमिका एकच आहे. राज्यात हिंदीची सक्ती नाही, तर मराठीची सक्ती आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे, तर अनिर्वाय असा शब्द आम्ही हटवला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मात्र दुसरीकडे पहिली ते चौथी हिंदी नकोच अशी थेट भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे.
हिंदीच्या वादावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत, मात्र दुसरीकडे हिंदीच्या वादावरून सरकारमध्ये मतभेद असल्याचं पाहायला मिळत आहे. पहिली ते चौथी हिंदी नकोच अशी भूमिका अजित पवार यांची आहे, तर राज्यात मराठीची सक्ती आहे, हिंदीची सक्ती नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे अनिर्वाय शब्द हटवण्यात आला आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. सरकारमध्ये असून अजित पवार यांचा हिंदीला विरोध आहे.काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली मला असं वाटतं पहिली, दुसरी, तिसरी, चौथीमध्ये हिंदी असू नये, पाचवीपासून हिंदी असावं. पहिलीपासून मराठी भाषाच असावी, त्यांना मराठी शिकवावी. ज्यावेळी ते पहिलीपासून मराठी भाषा लिहायला आणि वाचायला शिकतात तेव्हा त्यांना हिंदी भाषा देखील लिहिता वाचता येते. फक्त बोलण्याच्या संदर्भात पाचवीपासून सुरुवात केली तरी काही हरकत नाही. तेव्हा पाचवीपासून हिंदी सक्तीची करावी.
तर दुसरीकडे यावर आक्षेप घेणाऱ्यांशी बोलून निर्णय घेऊ, अनिर्वाय शब्द काढला आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे शिंदे यांची भूमिका ही भाजपला सुसंगत अशीच आहे. या सर्व घडामोडींवर एकनाथ शिंदे यांचे मंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरे यांची देखील भेट घेतल्याचं पाहायला मिळालं. मात्र या संदर्भात अजित पवार यांची वेगळी भूमिका असल्याचं पाहायला मिळत आहे.
