स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार ?
मुंबई/आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार असल्याचे समजते .याबाबत महाविद्या प्रमुख नेत्यांची बैठकी झाली असून जागा वाटपाबाबत महत्त्वाच्या बैठकी आता सुरू होणार असल्याचे वृत्त आहे. भाजपला कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका जिंकायची आहे .त्यामुळे मुंबई महापालिका आणि इतर महापालिका एकत्र लढण्याबाबत भाजपा आता नव्याने विचार करीत असल्याचे समजते.
राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आहे. या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रच लढायच्या असा निर्णय महायुतीच्या नेत्यांनी घेतल्याची माहिती समोर येत आहे. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठक पार पडली. या बैठकीत स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाची चर्चा झाली. तसेच जागा वाटपासंदर्भात देखील चर्चा झाल्याचे समजते. दरम्यान, कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढ यांनी सूचक वक्तव्य केले होते. मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर बसावा ही आमची इच्छा आहे असं कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले. महापौर कोण होणार ? हे मुख्यमंत्री व महायुतीचे नेते ठरवतील असेही मंगलप्रभात लोढा म्हणाले. मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार तयारी सुरु केल्याचे दिसत आहे.
राज्यातील महानगरपालिकांचं निवडणुका दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे. कारण नगरविकास विभागानं सुधारित जीआर काढलाय.. या जीआरमध्ये सर्व महानगरपालिकांना ६ ऑक्टोबरपर्यंत अंतिम प्रभाग रचना अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आलीय.. त्यामुळे राज्यातील सर्व महापालिका निवडणुकांचं बिगुल दिवाळीनंतर वाजणार आहे.. राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान होणार आहे.
