ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

शांतता आणि संयम हीच शहिदांना श्रद्धांजली अमित ठाकरेंचे पंतप्रधानांना पत्र

मुंबई/पाकिस्तान बरोबरचे युद्ध केवळ स्थगित झाले आहे अजून संपलेले नाही त्यामुळे जल्लोष थांबवा शांतता आणि संयम हीच या युद्धातील शब्दाना श्रद्धांजली ठरेल असे अशा शब्दात अमित ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींकडे नाराजी व्यक्त केली आहे.पण युद्धातील विजयाचे श्रेय लाटण्याच्या प्रयत्नात तिरंगा यात्रा काढणाऱ्या भाजपा वाल्यांना हे आवडलेले नाही त्यामुळे त्यांनी अमित ठाकरेंवर टीका करायला सुरुवात केली आहे
देशभर सुरु असलेल्या जल्लोषाबाबत मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. अनेक सैनिकांचे बलिदान शौर्यगाथा असूनही आनंद दर्शक आंदोलने विजय यात्रा या समर्पक वाटत नाही. या काळात होणारे उत्सव अनेकांच्या मनाला वेदना देणारे आहेत. युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा आणि देशाच्या शहीद झालेल्या वीरांना खरी श्रद्धांजली म्हणून संयम बाळगावा, मनसे नेते अमित ठाकरे यांनी म्हटलं.आपल्या नेतृत्वाखाली देशाने अनेक महत्त्वपूर्ण टप्प्यांवर निर्णायक वाटचाल केली आहे. विशेषतः राष्ट्रीय सुरक्षेबाबत आपण घेतलेले कठोर पण आवश्यक निर्णय देशहितासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहेत, याबद्दल आपले आभार. सध्या सीमारेषेवर निर्माण झालेल्या स्थितीमुळे जनतेचं लक्ष पूर्णपणे आपल्या भारतीय सैन्याकडे केंद्रित झालं आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये आपल्या शूर सैनिकांनी दाखवलेले धाडस, शिस्त, समर्पण आणि राष्ट्रासाठीचा त्याग हे संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद आणि गौरवास्पद आहे. भारतीय लष्कराने आपल्या शौर्याने संपूर्ण देशाच्या हृदयात अढळ स्थान मिळवलं आहे.आज देशात प्रत्येक घरातून, चौकात, सोशल मीडियावरून सैनिकांच्या कार्याला सलाम केला जात आहे. सैन्याच्या प्रत्येक हालचालीकडे आज देश प्रेमाने आणि गर्वाने पाहत आहे. त्यांच्या अद्वितीय शौर्यामुळेच आपण सुरक्षित आहोत आणि म्हणूनच त्यांचे कार्य कुठल्याही सन्मानापेक्षा मोठे आहे. या पार्श्वभूमीवर, सध्या काही ठिकाणी विजयाचं प्रतीक म्हणून जे उपक्रम राबवले जात आहेत, त्याबाबत समाजात भावनिक संभ्रम आहे. ही परिस्थिती विजयाची नसून ‘(युद्धविराम) आहे. आणि म्हणूनच, ज्या घटनेत आपल्या शूर जवानांनी प्राणत्याग केला, त्याच काळात साजरे होणारे उत्सव अनेकांच्या मनाला वेदना देणारे आहेत.असे त्यांनी पत्रात म्हटले आहे दरम्यान अमित ठाकरेंच्या या पत्रावर भाजपवाल्यांनी टीका सुरु केली आहे सैन्याच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्या ऐवजी अभिनंदन करणाऱ्यांवर टीका करून पंतप्रधान मोदींना पत्र पाठवणे हा अमित ठाकरेंचा बालिशपणा असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.तर सैन्याच्या शौर्याच्या सन्मानार्थ आम्ही तिरंगा यात्रा काढणारच असे मंत्री आशिष शेलार यांनी म्हटले आहे मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनीही तिरंगा यात्रेच समर्थन करून अमित ठाकरेंच्या पत्राबाबत नाराजी व्यक्त केली आहे

error: Content is protected !!