ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

हिंदीच्या सक्ती बाबत मनसेचा सरकारला इशारा

मुंबई/शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या सक्तीला मनसेने विरोध केला आहे. उत्तरेतील लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचा आहे. त्यासाठी आयएएस लॉबी कडून महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करण्यासाठी दबाव आणला जात आहे. असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे .तसेच कोणत्याही परिस्थितीत आम्ही हिंदीची सक्ती होऊ देणार नाही त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू. असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान राज ठाकरे यांच्या या इशाऱ्यानंतर शालेय अभ्यासक्रमात हिंदीची सक्ती करण्यात आलेली नाही, असा थातूरमातूर खुलासा करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारवासारव सुरू केली आहे.
राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या निर्णयाला मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कडाडून विरोध केला आहे. पंतप्रधान मोदी, अमित शाह असताना त्यांच्या गुजरात राज्यासह इतर राज्यात हिंदीची सक्ती नाही, मग महाराष्ट्रातच का? उत्तरेतील लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचा आहे. त्यासाठी आयएएस अधिकाऱ्यांच्या लॉबीकडून महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करण्यासाठी दबाव आणला जात आहे, असा आरोप मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केला. तसेच मनसे कोणत्याही परिस्थितीत राज्यात हिंदी सक्ती होऊ देणार नाही. शाळांमध्ये हिंदी कसे शिकवले जाते, हे आम्ही बघूच. राज्य सरकार याला आव्हान समजत असेल तर त्यांनी तसे समजावे, असे राज ठाकरे यांनी म्हटले. राज ठाकरे यांच्या या टीकेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. ते पुण्यातील देहू येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्याच्यादृष्टीने त्रिभाषा सूत्र कसे फायदेशीर आहे, समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
मनसेच्या प्रखर विरोधानंतर सारवासारव करताना मुख्यमंत्री म्हणाले,आपण असं म्हटलं आहे की, कुठलीही तिसरी भारतीय भाषा तुम्हाला शिकता येईल. तीन भाषेचं सूत्र, नवीन शैक्षणिक धोरण त्यांनी केलं, त्यामध्ये मातृभाषा ही अनिवार्य आहे. त्याच्या व्यतिरिक्त दोन भाषा, त्यापैकी एक भारतीय भाषा असली पाहिजे. एक स्वाभाविकपणे आपल्याकडे इंग्रजी स्वीकारतात, त्यामुळे कुठलीही तिसरी भारतीय भाषा, त्यामध्ये आपण पहिले हिंदी म्हटल होतं, कारण हिंदीचे शिक्षक आपल्याला मोठ्याप्रमाणाव उपलब्ध होतात. कुठलीही भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून शिकता येईल. त्यासाठी 20 विद्यार्थी असले तर शिक्षक दिला जाईल, ऑनलाईन पद्धतीने ट्रेनिंग दिलं जाईल. आज जो बदल आपण केलं आहे, हिंदी भाषेची अनिवार्यता काढण्याचा आणि कुठलीही भारतीय भाषा शिकण्याचा पर्याय आपण विद्यार्थ्यांना दिला आहे. आपण सगळे लोक इंग्रजीचा पुरस्कार करतो आणि भारतीय भाषांचा तिरस्कार करतो, हे योग्य नाही. भारतीय भाषा इंग्रजीपेक्षा चांगल्या आहेत. इंग्रजी ही व्यवहार भाषा झाली आहे. पण या नवीन शैक्षणिक धोरणाने सर्वांत महत्त्वाचं काम कोणतं केलं असेल तर मराठीला ज्ञानभाषा बनवण्याचा मार्ग खुला केलाय. आता आपणा इंजिनिअरिंग मराठीत शिकवायला लागतो. नव्या शैक्षणिक धोरणामुळे जे डॉक्टर्स बनत आहे, एमबी मराठीत बनतायत. नव्या शैक्षणिक धोरणामु‌ळे मराठीला वैश्विक भाषा ज्ञान भाषा आणि अर्थकरणाची भाषा बनवण्याचे दालन उघड केले महाराष्ट्र सरकारने ते स्वीकारला आहे त्यामुळे अशा प्रकारचा अभिवादन योग्य नाही असे फडणवीस म्हणाले सरकारच्या जीआर मध्ये स्पष्ट सांगितले आहे की कुठल्याही शाळेत मराठी अनिवार्य असेल हिंदीला मात्र पर्याय दिले आहेत माझी राज ठाकरेंची चर्चा झाली त्यांचं म्हणणं असं आहे की दोनच भाषा असल्या पाहिजे तिसरी भाषा तुम्ही लागू नका मात्र मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असेही फडणवीस म्हणाले
चौकट

राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत हिंदी भाषेच्या सक्तीविरुद्ध सरकारला इशारा दिल्यानंतर, मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले .भांडुप कांजूरमार्ग भागात शालेय पुस्तकांची विक्री करणाऱ्या दुकानात शिरून त्यांनी हिंदी भाषेची पुस्तके ताब्यात घेऊन रस्त्यावर त्यांची होळी केली.तसेच शालेय शिक्षणातील हिंदी पुस्तके ठेवू नयेत अशी दुकानदारांना वार्निंग दिली.

error: Content is protected !!