ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

ओबीसी नेत्यांना मराठ्यांबद्दल द्वेष का ? जरंगे पाटलांचा ओबीसींना जाहीर सवाल


नाशिक – मराठा आंदोलनासाठी आमरण उपोषण करणाऱ्या जरंगे पाटील यांनी नाशिकमध्ये भाषण करताना ओबीसी निर्याणा मराठ्याबद्दल दोष का ? असा सवाल केला. . त्यांनी उन्हात उभं राहून भाषण सुरु केलं. “मला खुर्ची नाही पाहिजे, मराठ्यांना आरक्षणच पाहिजे. सरसकट कुणबी आरक्षण पाहिजे. आता मागे हाटायचं नाही. आरक्षण मिळू नये म्हणून खूप जण डोकावत होते, तुमच्या लेकराने त्यांचाही बंदोबस्त केला”, असा टोला मनोज जरांगे यांनी लगावला. “ज्या मराठा आंदोलकावर हल्ला झाला त्याच्यावर आज मुंबईत शस्रक्रिया आहे”, असं जरांगे यांनी यावेळी सांगितलं.
“आमच्यावर हल्ला का केला? याचे उत्तर अजूनही दिले नाही. ज्या माय माऊलीच्या अंगावर रक्त सांडलं होतं त्या माय माउलीने सांगितले आता आरक्षण घेतल्याशिवाय थांबायचं नाही. विदर्भातील मराठे शेतकरी म्हणून त्यांना आरक्षण, तर आम्ही काय समुद्रात आहोत का? आम्ही पण शेती करतो”, असं मनोज जरांगे म्हणाले.
“जी जात मागास सिद्ध झाली ती जात मराठा आहे. त्यामुळे ओबीसीमधून आरक्षण मिळालेच पाहिजे. ४० दिवस देतो पण आरक्षण पाहिजेच, सगळे कामालाच लागली. माझ्या नादाला लागले की कार्यक्रम उलटा असतो, तुम्ही म्हणाले आरक्षणाला विरोध नाही म्हणून उपोषण सोडलं”, असं जरांगे म्हणाले. “मंत्री छगन भुजबळ म्हणाले, आमची ६० टक्के लोकसंख्या, ६० टक्के ओबीसी, ३४ टक्के मराठे, २० टक्के एससी, एसटी. १५० टक्के लोकसंख्या असते का? मंडल कमिशन ने दिलेले १४ टक्के घ्या, आमचे आरक्षण आम्हाला द्या”, असंही जरांगे यावेळी म्हणाले.
“तुम्ही सांगायला पाहिजे. मराठा समाजाने उपकार केले ते फेडायची वेळ आलीय, याची तुम्हाला जाणीव झाली नाही का? कधीतरी मराठ्यांची भावना समजून घ्या. परतफेड करायची वेळ आली आहे. ओबीसीतून घेऊ नका म्हणतात. खालून घेऊ की वरून घेऊ?”, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला.’
“मी उल्टा औलादीचा नाही, ते पाहुणे आहेत का? भुजबळ साहेबांवर चार दिवस झाले मी बोलत नाही. त्यांनी आरक्षणाला विरोध केला नाही, असं म्हटलं म्हणून नाव सुद्धा घेतलं नाही. तुम्ही विरोध केला तर मग आपला दणका अवघड असतो. मग सुट्टी नाही. मी जाहीर सांगतो, ओबीसी नेते आणि सगळ्या पक्षांच्या नेत्यांना सांगतो. मी मराठ्यांचा द्वेष करत नाही, मराठ्यांना आरक्षण द्यायचं म्हणून लढायला तयार आहे, असे सांगा. तुमच्यात मराठ्यांच्या बद्दल द्वेष का भरलाय? हे सांगायला तयार नाही”, असं जरांगे यावेळी म्हणाले.
“मराठ्यांच्या मुलांच्या ताटात विष कालवू नका. मराठा नाव घेतलं की ते लगेच विरोध करतात. ओबीसीत मराठा समाज आला तर कमी होईल. ग्रामीण भागात मराठा आणि ओबीसी एकत्र आहे. फक्त नेतेच विरोध करतात. त्यांचे आणि आपले पण धडाचे नाहीत. हे खोट बोलून ओबीसी बांधवांना वेड्यात काढत आहे. मराठा सगळा ओबीसी आरक्षणात गेले, फक्त आम्हीच राहिलो. दिलं १४ टक्के, खातो ३० टक्के, किती खातो?”, असा सवाल जरांगे यांनी केला.

error: Content is protected !!