ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

ठाकरेबंधु एकत्र येण्यावर अखेर शिक्कामोर्तब ?

मुंबई/ महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल आणि आम्ही संदेश नव्हे तर सरळ बातमी देऊ असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना मनसे एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत त्यामुळे ठाकरे बंधूंचे ऐक्य आता दृष्टीपथा असल्याचे स्पष्ट झाले आहे
गेल्या काही महिन्यांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा सुरू होत्या त्याची सुरुवात राज ठाकरे यांनी त्यांच्या मुलाखतीत बोलताना केली होती. त्यानंतर शिवसेना आणि मनसे यांच्या एकत्र येण्याच्या हालचाली नाव वेग आला होता याबाबत बोलताना आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते की महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या भल्यासाठी जे सोबत येतील त्यांचे स्वागत असेल तर ठाकरे बंधूंच्या एक याबाबत बोलताना अमित ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती एक याबाबत ते दोन भाऊ एकमेकांशी बोलतील याबाबत इतर आणि बोलण्याची आवश्यकता नाही तसेच ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या हालचाली वाढल्यानंतर संजय राऊत यांचाही राज ठाकरे बाबतचा सूर बदलला होता पूर्वी राज ठाकरेंच्या निवासस्थानाला कॅफे हाऊस म्हणणारे संजय राऊत आता मात्र राज ठाकरेंचे निवासस्थान हे आमचे दुसरे घर आहे असे म्हणू लागले होते या सर्व बदलत्या घडामोडींचा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांवर ही सकारात्मक परिणाम झालेला दिसत होता नाशिकमध्ये मनसेच्या कार्यालयाच्या नूतनीकरणा च्या निमित्ताने आयोजित केलेल्या महापूजेला शिवसेनेचे सर्व पदाधिकारी हजर होते तसेच डोंबिवलीतही ठाकरे गटाने मनसे सोबत एकत्र येत आंदोलन केले होते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेमुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे अगदी सुरुवातीपासूनच राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे असे दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना वाटत होते परंतु एकत्र येण्याचा मात्र योग येत नव्हता 2025 मध्ये पुन्हा शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या आणि या हालचालींना दोन्हीकडच्या नेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येत असल्याचे पाहून महायुतीतील नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे त्यामुळे काही नेते राज उद्धव एकत्र येणार नाहीत असे ठामपणे सांगत आहेत परंतु त्यांचेही गळालेले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र ठाकरे बंधू एकत्र येणार असतील तर त्याचं ते ठरवतील अशी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे मनसेचे संदीप देशपांडे सोडले तर इतर सर्व नेते ठाकरे बंधू एकत्र येण्यामुळे खुश असल्याचे दिसत आहेत त्यामुळे आता हे दोन बंधू एकत्र येण्याची घोषणा कधी होते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे
चौकट
काँग्रेसचा हात सोडण्याची मनसेची अट?
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार हे जवळपास आता नक्की झाली आहे परंतु उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने काँग्रेसचा हात सोडावा अशी मनसेची अट असल्याचे बोलले जाते मात्र त्याबाबत अजून तरी अधिकृत अशी माहिती उपलब्ध झालेली नाही किंवा यावर स्वतः राज ठाकरे काहीही बोललेले नाहीत अशा स्थितीत जर ठाकरे बंधू एकत्र आले तर उद्धव ठाकरे खरोखरच महायुतीची साथ सोडणार का असा प्रश्न विचारला जात आहे

error: Content is protected !!