[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

भारताच्या महिला संघानेही पाकिस्तानला लोळविले – वर्ल्डकप मध्ये पाकवर ८८ धावांनी विजय


कोलंबो/भारतीय महिला क्रिकेट संघानं पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाला १५९ धावांवर बाद करत मोठा विजय मिळवला आहे. भारतानं हा सामना ८८ धावांनी जिंकला आहे. भारतानं प्रथम फलंदाजी करताना २४७ धावा केल्या होत्या. पाकिस्तानला विजयासाठी २४८ धावा करायच्या होत्या. मात्र, भारताच्या गोलंदाजांपुढं पाकिस्तानचा संघ १५९ धावांवर बाद झाला. भारतानं पाकिस्तान विरुद्ध सलग १२ वेळा विजय मिळवला आहे. भारत या विजयासह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. तर पाकिस्तान सहाव्या स्थानावर आहे. पाकिस्तानचे या स्पर्धेत दोनवेळा पराभव झाले आहेत.
महिला वनडे वर्ल्ड कपमध्ये सहाव्या मॅचमध्ये भारत आणि पाकिस्तान आमने सामने आले होते. पाकिस्ताननं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतानं ५० ओव्हरमध्ये २४७ धावा केल्या होत्या. भारताकडून सर्वाधिक धावा हरलीन देओल हिनं केल्या. तिनं ४६ धावा केल्या. पाकिस्तानकडून डायना बेग आणि सना यांनी २/२ विकेट घेतल्या.
२४७ धावांचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. मनीबा अली रन आऊट झाली. सदफ शमास ६ धावा करुन बाद झाली. क्रांति गौड हिनं विकेट घेतल्या. आळिया रियाझ २ धावा करुन बाद झाली. नतालिया परवेझनं ३३ धावा केल्या. कॅप्टन फातिमा सना केवळ २ धावा करु शकली. सिदरा नवाज हिनं १४ धावा केल्या सिद्रा अमीन हिनं ८१ धावांची खेळी केली.
भारताच्या डावाची सुरुवात चांगली झाली होती. प्रतिका रावल आणि स्मृती मानधना यांनी पहिल्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी केली. स्मृती मानधना २३ धावा करुन बाद झाली. प्रतिका रावलनं ३१ धावा केल्या. हरमनप्रीत कौर १९ धावा करु शकली. हरलीन देओलनं ४६ धावा केल्या. जेमिमा रॉड्रिग्जनं ३२ तर स्नेह राणानं २० धावा केल्या. रिचा घोषनं ३५ धावा केल्या.भारताकडून क्रांती गौडनं ३ विकेट घेतल्या. दिप्ती शर्मानं ३ आणि स्नेह राणानं २ विकेट घेतल्या.

error: Content is protected !!