ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मोदी- शहावर टीका करणाऱ्या आदित्य ठाकरेंना नारायण राणेंचा इशारा

मुंबई/ पहिल्याच पावसात मुंबईत पाणी तुंबल्याने मुंबईकरांची दाणा दान उडाली होती .त्यावरून आता राजकारण पेटले आहे.आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारसह केंद्रीय नेत्यांवरही टीका केली होती त्यावर पलटवार करताना मुंबईतील परिस्थितीला उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचा आरोप करून मोदी शहा यांच्यावर टीका केलीस तर याद राख अशी नारायण राणे यांनी आदित्य ठाकरें इशारा दिली आहे.
राजधानी मुंबईत सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडवली होती. मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. शहरातील भुयारी मेट्रो स्टेशनमध्ये पाणीच पाणी झाल्याने काही दिवसांपूर्वीच उद्घाटन झालेल्या मेट्रोचे स्थानकाचे धिंदवडे निघाले होते. त्यानंतर, शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मेट्रो स्टेशनची पाहणी केल्यानंतर भाजप आणि महायुती सरकारवर थेट निशाणा साधला. तर, आज पत्रकार परिषदेतून पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केलं आहे. नगरसेवकांना फोडण्यासाठी वापरला जाणारा पैसा हा मुंबईकरांचे आज जे हाल झाले त्यातून काढलेला असल्याचे आदित्य यांनी म्हटले होते. तसेच, केंद्रातील भाजप नेत्यांवरही आदित्य यांनी हल्लाबोल केला. त्यावरुन, आता माजी मंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंना थेट इशारा दिला आहे. आदित्य ठाकरे, तू मोदी, शाह, फडणवीस यांची नावं घेतलीस तर याद राख, अशा शब्दात नारायण राणेंनी ठाकरेंचना दम भरला.
नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तर मुंबईतील पावसाची आठवण सांगताना नारायणे राणेंनी 26 जुलै 2005 ची घटना सांगितली. मुंबईत अतिवृष्टी झाली, विरोधकांमध्ये हाहाकार उडाला आहे. पत्रकारांना बिझी केले आहे, 26 मे रोजी 252 मिमी पाऊस मुंबईत पडला. पण, आदित्य, उद्धव ठाकरे यांना एक आठवण करून देतो. 26 जुलै 2005 ला 944 मिमी पाऊस मुंबईत पडला होता. त्यावेळी, 27 तारखेला उद्धव ठाकरेंचा वाढदिवस होता, त्यांची राजवट असताना पडला, तरी मुंबई बुडाली नव्हती, असे नारायण राणेंनी म्हटलं.
अनेकवेळा ते मागील काळातील फोटो दाखवतात हे मी पाहिले आहे. हिंदमाताचे फोटो दाखवले जातात. आदित्य ठाकरे काल बोलला, आज प्रेस झाली. पण, 2005 साली महापालिकेत कुणाची सत्ता होती, मिठी नदी नव्हती का, आता आली का? तेव्हा साफ केली होती का? तरी पण पाणी का भरले? वस्त्यांमध्ये पाणी का गेले? किती वय होते तुझे, आठवण कर, काहीही बोलतो. कमाईचे साधन निर्माण करण्यासाठी काहीही बोलतो, असे सवाल नारायण राणेंनी उपस्थित केले आहेत. सन 1985 साली मी नगरसेवक झालो, मी बेस्ट चेअरमन झालो, तेव्हा पालिकेत काय चालले होते, तू नव्हता, मी होतो. टक्केवारी किती असायची, संजय राऊत आहे ना बडबड करतो, तो शिवसेनेत नाहीतर लोकप्रभामध्ये होता. बाळासाहेबांविरुद्ध बोलायचा, तो संपादक म्हणून आला, आता, सकाळी उठला की प्रेसकडे धावतो, असे म्हणत नारायण राणेंनी संजय राऊतांवरही टीका केली.

error: Content is protected !!