केदारनाथ यात्रेच्या मार्गावर भूस्खलन अनेक यात्रेकरू अडकले
रुद्रप्रयाग/उत्तराखंडातील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ यात्रेवर नैसर्गिक संकटामुळे हजारो भाविक अडकले आहेत. पवित्र यात्रामार्गावरच भूस्खलन होऊन दरड कोसळल्याने गौरीकुंड ते केदारनाथ हा पायीमार्ग आता अस्थायी रुपाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेकडो भाविक अडकून पडले आहेत. पाऊस आणि ढगफुटीने हा परिसर संवेदनशील बनला आहे.प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार येथे भूस्खलनाने रामबाडा आणि जंगलचट्टी दरम्यानची पायवाट नष्ट झाली आहे. येथे पर्वतांवरुन लागोपाठ माती आणि दगडाची घसरण होत आहे. त्यामुळे हा मार्ग संपूर्णपणे क्षतिग्रस्त झाला आहे. भाविकांच्या सुरक्षेचा विचार करुन सध्या केदारनाथ यांची यात्रेला थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.केदारनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांना सुरक्षित स्थानांवरच थांबवण्यात आले आहे. प्रशासनाच्यावतीने बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे. एसडीआरएफ आणि पोलिसांच्या पथकांना महत्वांच्या जागांवर तैनात करण्यात आले आहे. हवामान विभागाने येत्या ४८ तासांत मोठा पाऊस येण्याचा अंदाज वर्तवला असल्याने परिस्थिती आणखीनच बिकट होऊ शकते असे म्हटले जात आहे.केदारनाथ यात्रेला निघालेल्या भाविकांना आवाहन केले आहे की त्यांनी घाबरु नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. प्रशासनाने भाविकांची सुरक्षा करता यावी यासाठी गौरीकुंड आणि सोनप्रयाग या ठिकाणी भाविकांना थांबवले आहे.
प्रतिकूल हवामानाचे संकट
केदारनात यात्रेला दरवर्षी लाखो श्रद्धाळूंना आकर्षित करत असते. परंतू पर्वतांचा क्षेत्रात प्रतिकूल हवामानाच्या माऱ्याने नेहमीच ही यात्रा प्रभावित होत असते. स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकार स्थितीवर नजर ठेवून असून रस्त्या मोकळा होता ही यात्रा पुन्हा सुरु करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.
