ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

पहिल्याच पावसात हाहाकार -महापालिकेच्या उपाययोजनांचा फज्जा

मुंबईच्या रेल्वे व रस्ते वाहतुकीचा बोजवारा**
** भुयारी मेट्रो स्थानकांमध्ये पाणी शिरल्याने प्रवाशांमध्ये घबराट*

मुंबई /अवकाळी पावसापाठोपाठ आता मोसमी पावसाला सुरुवात झाली आहे. काल सोमवारी पहिल्याच पावसात संपूर्ण महाराष्ट्रात दणादण उडाली. राजधानी मुंबईच्या अनेक भागात पाणी साचले त्यामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. या पावसाचा मेट्रोलही फटका बसला. मेट्रोच्या ३ भुयारी स्टेशन मध्ये पाणी शिरले त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.भुयारी मेट्रो स्थानकात पाणी शिरल्याने या मेट्रो रेल्वेच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे राज्याच्या इतर भागात प्रचंड पाऊस पडला आहे सर्वाधिक पाऊस रायगड जिल्ह्यात झाला असून वीज पडून एकाचा मृत्यू झाला तर कर्जत तालुक्यात नदीला आलेल्या पुरामुळे रायगड जिल्ह्यातील ३५ गावांचा संपर्क तुटला होता. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आपत्कालीन व्यवस्थापनाला अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत.
मागील २४ तासांपासून राज्यात ठिकठिकाणी कोसळधारांमुळे तर काही भागांमध्ये बरसत असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई, बारामती व कर्जत शहरांमधल्या रस्त्यांवर पाणीच पाणी चोहीकडे अशी स्थिती निर्माण झाली आहे. ठाणे व पुण्यातील मुख्य रस्ते जलमय झाले आहेत. नागरिकांना रस्त्यावरून वाहनं चालवताना अडथळे येत आहेत. दरम्यान, कोकण व पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही तास जोरदार पाऊस सुरू राहिल असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. एवढंच नाही तर पावसामुळे मुंबईचा वेगही मंदावला आहे. लाइफ लाइन समजली जाणारी लोकल सेवा १५ ते २० मिनिटे उशिराने सुरु आहे. यासह महत्त्वाच्या घडामोडींवर आपली नजर असणार आहे
मुंबईसह राज्यभरात पावसाची दमदार हजेरी आहे. मागील २४ तासांपासून राज्यात ठिकठिकाणी कोसळधारांमुळे तर काही भागांमध्ये बरसत असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन, विस्कळीत झालं आहे. मुंबई, बारामती व कर्जत शहरांमधल्या रस्त्यांवर पाणीच पाणी चोहीकडे अशी स्थिती निर्माण झाली आहे. ठाणे व पुण्यातील मुख्य रस्ते जलमय झाले आहेत. नागरिकांना रस्त्यावरून वाहनं चालवताना अडथळे येत आहेत. दरम्यान, कोकण व पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही तास जोरदार पाऊस सुरू राहिल असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. एवढंच नाही तर पावसामुळे मुंबईचा वेगही मंदावला आहे. लाइफ लाइन समजली जाणारी लोकल सेवा कोलमडून पडली पावसामुळे हार्बर मार्गावरील वादाला ते सी एस एम टी मार्गावरील लोकल पूर्णपणे ठप्प झाली.मध्य रेल्वेच्या सायन / कुर्ला तसेच भायखळा ते मस्जिद बंदर स्थानक दरम्यान पाणी साचल्याने वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू होती . तर पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गांवर ४ ते ५ किमी वाहनांच्या रंग लागल्या होत्या मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या सर्व स्थानकांवर तुफान गर्दी लोटली होती.मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे.माळशिरस जवळ नीरा नदीच्या पात्रात अडकलेल्या ६ जणांची बचाव पथकाने सुटका केली दरम्यान पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे महादेवाच्या मंदिरात पूजेसाठी गेलेले तीन साध भीम नदीच्या पुराच्या पाण्यात अडकले होते त्यांचीही सुटका करण्यात आली या पावसामुळे अनेक धरणातील पाण्याच्या पातळीत वाड झाल्याने पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे
राज्यात पुणे, सातारा, सोलापूर, रायगड, मुंबई आটিা एमएमआर या भागात अतिवृष्टी झालेली आहे. दौंडमध्ये ११७ मि.मी., बारामतीत १०४.७० मि.मी., इंदापुसत ६३.२५ मि.मी. इतका पाऊस झाला. बारामतीत २५ जराची अंशतः पडझड झाली असून, पुरात अडकलेल्या ७ लोकांना वाचविण्यात आले आहे. ७० ते ८० कुटुंबाना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. मोबाईल सेवा काल विस्कळित झाल्या होत्या. त्या आता पूर्ववत होत आहेत.

इंदापूर येथे 2 जणांना पुरस्थितीतून बाहेर काढण्यात आले आहे. फलटणमध्ये १६३.५ मि.मी. इतका पाऊस झाला. एनडीआरएफचं एक पथक फलटणमध्ये आहे. 30 नागरिक दुधेबावी गावाशेजारी अडकले होते. त्यांना निवास आणि भोजनाची सुविधा पुरविण्यात आली आहे.सोलापूरमध्ये ६७.७५ मि.मी. पाऊस झाला. माळशिरस तालुक्यात 6 नागरिक पुरात अडकले होते, त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पंढरपूर येथे भीमा नदी पात्रात 3 जण अडकले, त्यांचे बचावकार्य सुरु आहे.

रायगडमध्ये एकाचा वीज पडून मृत्यू झाला, तर महाड ते रायगड किल्ला रस्ता अतिवृष्टीमुळे बंद करण्यात आला आहे. – मुंबईत २४ तासांत १३५.४ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

मुंबईत एकूण ६ ठिकाणी पाणी साचण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. एकूण १८ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या तर 5 ठिकाणी इमारतीच्या भींती पडण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मुंबई महापालिका, अग्निशमन दल, मुंबई पोलीस आणि इतरही सर्व यंत्रणा सज्ज आहेत.
कुठेहीप्राणहानी झालेली नाही. मुंबईत ५ ठिकाणी एनडीआरएफ टीम कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी आहेत. मुंबईत पुढील २४तासांमध्ये विजांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे पावसाळ्यात वर्षा सहली सुरू होतात पण त्या धोकादायक असतात नवी मुंबईतील पांडव कडा हा पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे.याच ठिकाणी सोमवार धारावीतील ५ विद्यार्थी सहलीला गेले होते पण पावसाचा वेग वाढल्याने धबधबा वेगाने वाहू लागला त्यामुळे हे विद्यार्थी अडकून पडले अखेर अग्निशमन दलाने मोठ्या दोरीच्या सहाय्याने त्यांना बाहेर काढलेकालच्या मुसळधार पावसात मलबार हिलच्या व्हीआयपी भागात दरड कोसळली सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाहित मात्र राजभवन आणि मंत्र्यांच्या बंगल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर दगड मातीचा मोठा ढिगारा पसरला होता तो नंतर हटवला

उपसा पंप कंत्राटदारांची मनमानी पाहून पालिका आयुक्तांनी झापले

उपसा पंप महापालिकेकडून दरवर्षीप्रमाणे टेंडर काढले जाते सदर टेंडर मध्ये पाणी उपसा पंप मध्ये इलेक्ट्रिक कनेक्शन नसल्याने अनेक अनेक पंप जागेवर असताना ते कार्यवत नसल्याने अनेक ठिकाणी पाणी साचल्याने पंप कंत्राट कामाचा फज्जा उडाला. मुंबईचे महापालिका आयुक्त गगराणी यांनी या घटनेची दखल घेऊन स्ट्रॉंग वॉटर चे प्रमुख यांना झाप झाप झापले आणि नाराजी व्यक्त केली. अनेक ठिकाणी हे पंप नावाला उभा करून त्याचे पैसे महापालिकडून कंत्राटदार वसूल करत असल्याचे तक्रारी दरवर्षी सापडते परंतु या कंत्राटदारांवर तात्पुरती कारवाई करून बचाव केला जातो.

error: Content is protected !!