स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2 टप्प्यात ?
मुंबई/ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका ऑक्टोबर मध्ये होण्याची शक्यता असून, या निवडणुका ४ टप्प्यात घेण्याबाबत विचार सुरू असल्याचे समजते. या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली असून ,महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्ष स्वबळावर लढणार, की युती आणि आघाडी करून लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तर भाजपला कोणत्याही परिस्थितीत मुंबई महानगरपालिका जिंकायची असल्याने, भाजपाने मुंबईसाठी जोरदार तयारी सुरू केलेली आहे.
राज्यातील अनेक महापालिकांमध्ये दोन, तीन तर काही ठिकाणी ५ वर्षांपासून प्रशासनाकडून कारभार चालवला जातोय. निवडणुका न झाल्यामुळे तिथे सध्या प्रशासनाच्या अख्यत्यारित कामकाज सुरु आहे. आधी कोरोना संकट, यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सुप्रीम कोर्टात सुरु असलेली सुनावणी यामुळे निवडणुकांना विलंब झाला. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने 2022 आधीचं आरक्षण कायम ठेवायचा आदेश देत निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले. त्यानंतर निवडणूक आयोग तयारीला लागलं आहे. निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी करत आहे. त्यानुसार निवडणूक आयोग महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या चार टप्प्यात घेणार असल्याची माहिती समोर येत आहे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या चार टप्प्यात होणार असल्याची चर्चा आहे. तसेच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याची माहिती मिळत आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका या वेगवेगळ्या होणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी प्रभाग रचनेचं काम सुरु आहे. निवडणूक आयोगाकडून लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वेळापत्रक जारी केलं जाण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग त्यासाठीच तयारी करत आहे. असं असलं तरी निवडणूक आयोग चार टप्प्यात निवडणुका घेणार असल्याचं जाहीर करण्यात आलेलं नाही. याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत. निवडणूक आयोगाकडून याबाबत अधिकृत घोषणा केल्यानंतरही सर्व स्पष्ट होईल. पण याबाबत सध्याजोरदार चर्चा सुरू आहेत.दरम्यान, या निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारतो? याबाबत उत्सुकता आहे. याआधी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगलं यश मिळालं होतं. पण त्यानंतर सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. तर महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला. यानंतर आता काही महिन्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकींनंतर आता महाराष्ट्राचा आता नेमका काय मूड आहे? महाराष्ट्राच्या जनता महायुती की मविआ, यापैकी कुणाला जास्त पसंत करते ते स्पष्ट होणार आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकीकडे ठाकरे बंधूंच्या मनोविज्ञानाच्या चर्चा सुरू असतानाच मनसेतील काही नेत्यांमुळे या दोन्ही पक्षांच्या युतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे मनसेची परप्रांतीय आणि हिंदी विरोधी भूमिका अडचणीची असल्यामुळे महायुतीतील पक्षही मनसेला बरोबर घेण्यास फारसे उत्सुक नसल्याचे समजते या पार्श्वभूमीवर राज ठाकरे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत परंतु अजून तरी याबाबत राज ठाकरेंनी आपले पत्ते उघडलेले नाहीत.
