ऑपरेशन सिंदूरच्या दसक्याने दहशतवाद्यांचे जम्मू काश्मीर मधून पलायन
श्रीनगर/पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानी दहशतवादी संघटनांनी त्यांचे तळ पीओकेहून हलवण्यास सुरुवात केली आहे. संरक्षण सूत्रांतील अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दहशतवादी संघटना आता पीओकेला सुरक्षित आश्रयस्थान मानत नाहीत.
एप्रिल महिन्यात पहलमाग येथे नृशंस दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप नागिरक मारले गेले. यानंतर भारातने कठोर भूमिका घेत ऑपरेशन सिंदूर राबवलं. त्याअंतर्गत पीओक आणि पाकिस्तानातील अनेक दहशतवादी तळ लक्ष्य करण्यात आले, या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी ममारले गेले. भारतीय लष्कराने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर, आता पाकमधील दहशतवाद्यांनी भीतीने बोबडी वळली असून त्याच पार्श्वभूमीवर एक मोठी अपडेट समोर आली आहे पाकिस्तानी दहशतवादी गट जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन कडून त्यांचे अड्डे,ठिकाणं बदलण्यात आली आहेत. संरक्षण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या संघटना आता त्यांचे तळ पीओकेहून खैबर पख्तूनख्वा येथे हलवत आहेत. पाकिस्तानी सरकारी एजन्सी या प्रयत्नात त्यांना मदत करत असल्याची माहिती देखील समोर आली आहे.भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्यांनंतर आता पीओके सुरक्षित ठिकाण नसल्याचे दहशतवादी संघटनांनी घेतलेल्या या निर्णयावरून दिसून येते असे संरक्षण सूत्रांचे म्हणणे आहे. म्हणूनच, त्यांनी खैबर पख्तूनख्वा येथे आपले तळ हलवण्यास सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानशी जवळचे संबंध असल्याने ते ठिकाण अधिक सुरक्षित मानत आहेत
