ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

पाकिस्तानात पाण्यावरून हिंसाचार सुरू -तोडफोड, राडे, गृहमंत्र्यांचे घर जाळले, पोलिसांना चोपले


लाहोर/भारताने सिंधू जलपरा रद्द केल्यानंतर पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळाले आहे पाकिस्तानचे पाणी बंद झाल्याने तसेच जनतेला विश्वासात न घेता पाकिस्तानी पंतप्रधान आणि नद्याजोड प्रकल्प सुरू केल्याने पंजाब आणि सिंध या दोन प्रांतातील आंदोलकांनी एकमेका विरुद्ध अक्षरशः युद्ध पुकारले आहे दोन्ही प्रांतातील लोकांमध्ये तोडफोड जाळपोळ हाणामारी सुरू आहे आज संतप्त आंदोलकांनी सिंध प्रांतांच्या गृहमंत्र्याचे घर जाळले यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 10 आंदोलकांचा मृत्यू झाला तर शेकडो आंदोलन जखमी झाले पाकिस्तानात अक्षरशः पाणी पेटले आहे.

गेल्या काही दिवसापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू आहे. भारताने पाकिस्तान सोबतचा सिंधू पाणी करार स्थगित केला आहे. पाणी सुरू करण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत आहे. दरम्यान, त्यातच आता सिंधू नदीवरील ६ नव्या कालव्यांच्या प्रकल्पामुळे पाकिस्तानमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. पंजाब प्रांतासाठी प्रस्तावित असलेल्या या कालव्यामुळे सिंध प्रांतात तीव्र असंतोष पसरला असून, या प्रकल्पाला ‘पाणी लुटीचा डाव’ संबोधून विरोध उफाळून आला आहे.
पाकिस्तान सरकारने सिंधू नदीवर ६ कालवे बांधण्याचा निर्णय घेतला असून, हे सर्व कालवे पंजाब प्रांतात चोलिस्तान भागासाठी असतील. या प्रकल्पाद्वारे ४ लाख एकर वाळवंटी जमीन सिंचनाखाली आणण्याचा सरकारचा दावा आहे. मात्र यामुळे सिंध प्रांतातील लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यांचा आरोप आहे की, पंजाबच्या फायद्यासाठी सिंध प्रांताचे पाणी वळवले जात आहे.या प्रकल्पाविरोधात सिंधमध्ये सुरू असलेले आंदोलन आता हिंसक वळणावर गेले आहे. मंगळवारी सिंध प्रांताचे गृहमंत्री झियाउल हसन लांजर यांच्या नौशहरो फिरोज येथील निवासस्थानाला आंदोलकांनी आग लावली. घरातील वस्तूंची देखील जाळण्यात आले. या घटनेमुळे सिंधमध्ये प्रशासनाची चिंता वाढली आहे.या प्रकल्पावरून पाकिस्तानच्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्येही तणाव आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टी अर्थात पी पी पिचा या प्रकल्पाला विरोध आहे. पी पी पी पक्षाचा प्रमुख आधार असलेल्या सिंध प्रांतातील लोकांचे म्हणणे आहे की, पंजाब केंद्रित धोरणांमुळे त्यांना सातत्याने दुय्यम वागणूक दिली जात आहे. शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील पी एम एन एल पक्षावर पंजाबला झुकते माप देण्याचे आरोप केले जात आहेत.सिंध मधील आंदोलकांचे स्पष्ट म्हणणे आहे की, “आमच्या हक्काचे पाणी काढून पंजाबला देण्याचा हा डाव आहे.” आधीच सिंध प्रांतात पाण्याची टंचाई जाणवत आहे. अशा वेळी कालवे बांधून अधिक पाणी वळवले गेले, तर सिंधला गंभीर दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा तज्ञ देत आहेत.

कालवा प्रकल्प तात्काळ रद्द करावा
सिंधू पाणी करारातील पाण्याच्या योग्य वाटप करावे
सिंधला पर्यायी सिंचन व्यवस्था उपलब्ध करून द्यावी
आंदोलनकर्त्यांवरील सर्व खटले मागे घ्यावेत

error: Content is protected !!