छत्तीसगड मधील चकमकी २७ नक्षलवादी ठार
नारायणपूर/भारताच्या लष्कराने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ तळ उध्वस्त करून शंभराहून अधिक दहशतवाद्यांना ठार मारल्यानंतर, देशांतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली नक्षलवाद विरोधी मोहिमही तेज करण्यात आली आहे. छत्तीसगडच्या अबूजमाड मधील जंगलात पोलिस व नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत २७ नक्षलवादी मारले गेले .यात १ कोटींचे इनाम असलेला नक्षल कमांडर बसवराज राजूचा समावेश आहे.या चकमकीत एक जवान शहीद झाला.
गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेपासून २५ किलोमीटर अंतरावरील छत्तीसगडच्या अबुझमाड येथे बुधवार, २१ मे रोजी सकाळी पोलिस- नक्षल चकमक उडाली. यात २७नक्षलवादी ठार झाले, तर एक पोलीस जवान शहीद झाला. .
छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा, नारायणपूर आणि बिजापूर जिल्ह्याच्या सीमेवरील (ट्राय जंक्शन) अबुझमाडच्या जंगलांत विविध राज्यातून नक्षलवादी मोठ्या संख्येने एकत्र आले होते. विविध राज्यात पाच कोटीहून अधिक बक्षीस असलेला नक्षलवादी संघटनेचा सरचिटणीस व ‘पॉलिट ब्युरो’ सदस्य बसवा राजू याचादेखील यात समावेश असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाली. त्यानंतर या पारिसरात २० मे रोजी रात्रीच्या सुमारास दंतेवाडा, बिजापूर, नारायणपूर आणि कोंडागाव जिल्ह्यातील ५०० हून अधिक ‘डीआरजी’ व इतर सुरक्षा जवानांनी नक्षलविरोधी अभियान राबविले. २१ मे रोजी सकाळी पोलिसांकडून अभियान राबविले जात असताना नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने जोरदार गोळीबार केला. प्रत्युत्तरात सुरक्षा जवानांनी
केलेल्या गोळीबारात २७ नक्षलवादी ठार झाले, तर एक पोलिस जवान शहीद झाला. घटनास्थळावरून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर साहित्य व हत्यारे जप्त केली आहेत. चकमकीत नक्षल नेता बसवा राजूचा खात्मा झाल्याची माहिती आहे.आठवडाभरापूर्वी ३१ नक्षल्यांचा खात्मा तेलंगणा आणि छत्तीसगड सीमेवरील करेगुट्टा टेकडीवर आठवडाभरापूर्वी सुरक्षा यंत्रणेणे नक्षलवाद्यांविरोधात सर्वात मोठे अभियान राबवले होते. २३ दिवस चाललेल्या या चकमकीत ३१ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले होते. कुख्यात नक्षल कमांडर माडवी हिडमा नेतृत्व करीत असलेल्या सर्वात आक्रमक बटालियन क्रमांक १ चे जवळपास ७०० हून अधिक नक्षलवादी छत्तीसगड-तेलंगणा सीमवेरील करेगुट्टा टेकडीवर एकत्र आल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाली होती. यावरून केंद्र आणि राज्य सुरक्षा दलातील १० हजारहून अधिक जवानांनी ‘ऑपरेशन संकल्प’या नावाने मोहीम राबविली होती.ही मोहीम यशस्वी झाली.
