आरपीआय अल्पसंख्याक आघाडी महाराष्ट्र प्रदेश कमिटीची निवड – मुंबई जनसत्ता प्रतिनिधीचा नेत्यांना रोखठोक प्रश्न – मुंबईतील घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंग्याना जबाबदार कोण?
मुंबई : आर पी आय आठवले गटासोबत कार्यरत असणारे जेष्ठ नेते मुश्ताक बाबा यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी अधिकृत निवड करण्यात आली असल्याची माहिती पक्षाचे सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, सोहेल शेख, खुदुसभाई फारुखी, रफीक दाफेदार, सय्यद हबीब, अफजल चौधरी, आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना सोनवणे म्हणाले, राज्यातील पालिका निवडणुकीत आम्ही आता वेगळा प्रयोग करणार आहोत. कारण प्रत्येक महानगर पालिकेत आर पी आय ला विश्वासात घेतल्याशिवाय कोणत्याही पक्षाला बहुमत सिद्ध करता येत नाही.
या पत्रकार परिषदेमध्ये सा. मुंबई जनसत्ता प्रतिनिधी यांनी पत्रकार परिषदेमध्ये रोखठोक प्रश्न विचारला की मुंबईतील घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंग्या यांनी मुंबईत घुसून रेशन कार्ड आणि आधार कार्ड बनावट बनवून ते मतदान आणि शासनाच्या सोयी सुविधा लुटण्याचे काम करत आहे. याला जबाबदार कोण? याबाबत आपल्या पक्षाची भूमिका काय असेल या प्रश्नाला आरपीआय नेत्यांनी प्रशासनावर खापर फोडले . यावर पुन्हा आमच्या प्रतिनिधींनी पुन्हा प्रश्न विचारला की येथील काही लोक या घुसखोराना बसवण्याचे काम करत आहे. या प्रश्नावर पुन्हा नेत्यांनी प्रशासनावर खापर फोडले.
