ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मेलेल्याना कोण मारणार ? एकनाथ शिंदे


मुंबई : मेलेल्याना कोण मारणार महाराष्ट्राने अगोदरच त्याचा मुडदा पडला आहे अशा शब्दात कम ऑन किल मी असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंनी पलटवार केला.
आज ज्यांना मराठी माणसाची आठवण होत आहे त्यांच्यामुळेच मराठी माणूस मुंबईबाहेर गेला, आता मराठीच्या नावाने गळे काढत आहेत अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. ‘कम ऑन किल मी’ असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांचा मुडदा महाराष्ट्राने आधीच पाडला आहे, मेलेल्यांना काय मारणार असा टोलाही शिंदे यांनी लगावला. ते शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांचे नाव न घेता चांगलीच टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी लाचार झाले. त्यांनी हिंदुत्त्व बाजूला सोडून दिलं. महाराष्ट्रातील जनतेशी प्रतारणा केली. मतदारांना धोका दिला. उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी अगतिक, लाचार झाले, असे एकनाथ शिंदे म्हणाले. आता निवडणुकीचं वारं दिसत असताना त्यांना पुन्हा हिंदुत्त्व, मराठी माणूस आठवत आहे, असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी केला.२०२४ सालच्या निवडणुकीत ठाकरे गटाचा स्ट्राईक रेट फक्त 23 टक्के आहे. मतदारांनी ठाकरे गटाला कधीच टाटा-बाय-बाय केलंय. आपल्याकडे आत्मविश्वास आहे. त्यांच्याकडे अहंकार आहे. हा अहंकार त्यांना विनाशाकडे नेतोय, बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या काँग्रेसला आयुष्यभर बिरोध केला. त्याच कॉंग्रेसच्या दावणीला बांधण्याचं पाप जीणी केलं हे आपल्याला माहिती आहे. सत्तेसाठी लाचारी पत्करण्याचं काम कोणी केलं हेही आपल्याला माहिती आहे. त्यांनी २०१९ साली मराठी माणसांचा विश्वासघात -केला. महाराष्ट्राचा विश्वासघात केला. सरडाही रंग बदलतो. पण इतक्या वेगाने रंग बदलणारा सरडादेखील महाराष्ट्राने पाहिला. त्यांचेच सगेसोयरे, भाऊबंद हे सांगत आहेत, अशी थेट टीका एकनाथ शिंदे यांनी केली.मुख्यमंत्रिपदासाठी ते लाचार झाले. ते काय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे वारसदार होणार. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्त्वासाठी मतदानाचा अधिकारही गमावला. पण त्यांनी हिंदुत्त्व सोडलं नाही. पण बाळासाहेबांचे आम्ही वारसदार म्हणणाऱ्यांनी सत्तेसाठी लाचारी पत्करली. याला महाराष्ट्र साक्षीदार आहे. बाळासाहेब असते तर खुर्चीसाठी लाचार असणाऱ्या लोकांना त्यांनी उलटं टांगून खालून मिरचीचा धूर दिला असता. हिंदुत्त्व आणि मराठी माणसाशी विश्वासघात केल्यामुळे ते आता उतावीळ, लाचार झाले आहेत, अशी थेट टीकाही शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

error: Content is protected !!