ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

१५ जूनपासून सर्व बोईंग विमानांची तपासणी होणार


नवी दिल्ली/अहमदाबाद मध्ये बोईंग विमानाच्या टेक ऑफ नंतर जो भीषण अपघात घडला होता, त्या अपघातानंतर आता भारतातील सर्व ३७ बोईंग विमानांची टेकऑफ पूर्वी तपासणी करण्याचा निर्णय डी जी सी ए ने घेतला आहे. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमदाबाद मध्ये जाऊन, घटनास्थळाची पाहणी केली तसेच रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपये नुकसान भरपाई दिली जाणार आहे.
अहमदाबाद वरून लंडन कडे निघालेल्या बोईंग ए/१७१ विमानाला, टेक ऑफ नंतर अवघ्या दोन मिनिटात भीषण अपघात होऊन या अपघातात विमानातील २४१ प्रवासांचा मृत्यू झाला होता. तसेच हे विमान ज्या बीजे मेडिकल हॉस्टेलवर आदळले ,त्या हॉस्टेलमधील २६ जणांचा मृत्यू झाला होता. या विमान अपघातात २६५ लोकांना प्राण गमवावे लागले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटना स्थळाला भेट देऊन, संपूर्ण घटनेची माहिती घेतली.तसेच रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.तसेच या अपघातात बचावलेल्या रमेश विश्वकुमार याची भेट घेऊन त्याच्याकडून अपघाताची माहिती घेतली. त्यानंतर ईव्हीएशन आणि आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली .दरम्यान या अपघातानंतर डिजिसीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक महत्वाची बैठक झाली. या बैठकीत १५ जून पासून सर्व बोईंग विमानांची टेक ऑफ पूर्वी तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतात बोईंग ए१/१७१ ची ३७ विमाने आहेत या सर्व विमानांची उद्यापासून टेक ऑफ पूर्वी तपासणी केली जाणार आहे. दरम्यान सध्या ए ए आय ए कडून अपघाताची चौकशी सुरू आहे.अपघातग्रस्त विमानाचा 1ब्लॅकबॉक्स सापडला आहे.तसेच डी व्हि आर सुद्धा सापडला आहे. त्यामुळे हा अपघात नेमका कशामुळे झाला ते समजणार आहे.
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना टाटा कंपनीकडून प्रत्येकी 1 कोटी दिले जाणार असून, सर्व जखमींचा खर्चही कंपनी करणार आहे.तसेच ज्या हॉस्टेलवर विमान कोसळले त्या होस्टेलच्या दुरुस्तीचा खर्चही टाटा कंपनी करणार आहे.
विमान अपघातातील मृतदेहाच्या तुटलेल्या मुंडक्या सोबत सेल्फी
अहमदाबाद विमान अपघातात २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला. यातील अनेक मृतदेह छिन्न विछीन अवस्थेत होते. एका प्रवासी महिलेचे मुंडके रस्त्यावर पडले होते. याच मुंडक्या सोबत काही लोकांनी सेल्फी घेतल्याची संतापजनक घटना घडली आहे.सेल्फी घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संताप आहे.

error: Content is protected !!