ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

राज ठाकरे/ फडणवीस भेटीमुळे मराठी माणसाचा अपेक्षा भंग – ठाकरे बंधूंच्या ऐक्याची गाडी घसरली

मुंबई स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, ठाकरे बंधू एकत्र येणार या चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाल्या होत्या. काही ठिकाणी तर ठाकरे बंधूंच्या एक्क्याचे पोस्टर बॅनर लागले होते .दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते .असे असताना आज अचानक राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी अर्धा तास चर्चा केली. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या एकट्याला ब्रेक लागणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु होत्या. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका खेळीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील या सर्वात मोठ्या फँटसीचा विचका होण्याची शक्यता आहे. कारण ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील युतीसाठी चांगली राजकीय वातावरणनिर्मिती झाली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. मुंबईच्या वांद्रे परिसरातील ताज लँडस एन्ड या पंचतारांकित हॉटेलमध्ये राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. गेल्या अर्ध्या तासापासून या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे. त्यामुळे ही भेट म्हणजे ठाकरे गट आणि मनसे यांच्याती युतीला कायमचा ब्रेक लावणारी ठरणार का, याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या कलानगर येथील मातोश्री या निवासस्थानापासून काही अंतरावरच राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट पार पडली.
कलानगर ते ताज लँडस एन्ड या हॉटेलपर्यंतेच अंतर जेमतेम साडेसहा किलोमीटर इतके आहे. गेल्या काही “दिवसांपासून ग्राऊंड लेव्हलला ठाकरे गट आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलनाचे अनेक प्रसंग पाहायला मिळाले होते. दोन्ही पक्षांचे प्रमुख नेतेही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे याच्या एकत्र येण्याविषयी सकारात्मक बोलताना दिसत होते. त्यामुळे ठाकरे गट आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता कधी नव्हे इतकी वाढली होती. त्यामुळे आता मनसे-ठाकरे गटाची युती होणारच या आनंदात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि नेते मश्गुल होते. हे सर्वजण गाफील असताना चाणाक्ष देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरे याची भेट घेतली आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस याच्यात चांगले राजकीय सबंध निर्माण झाले आहेत. गेल्या काही काळात या दोन्ही नेत्यांच्या अनेक भेटीगाठी झाल्या आहेत. मात्र, राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी हातमिळवणी केली असती तर मुंबईतील राजकारणात मोठे बदल झाले असते. या दोन्ही नेत्य मानणारा मोठा वर्ग मुंबई, नाशिक, ठाणे या शहरी भागांमध्ये आहे.त्यामुळे ठाकरे बंधूंच्या एकत्रित टाकायचा परिणाम होऊ शकतो.हे ओळखूनच फडणवीस यांनी राज ठाकरेना आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न चालवले आहेत.

error: Content is protected !!