मुंब्र्यात भीषण रेल्वे अपघात लोकल ट्रेनमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू
ठाणे/ प्रवाशांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ अप आणि डाऊन मार्गावरील दोन ट्रेन एकमेकांच्या अगदी जवळून गेल्याने दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशांना धक्का लागून १३प्रवासी खाली पडले त्यात ५ जणांचा मृत्यू झाला तर ८ जखमी आहेत.या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने लोकल ट्रेनना स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
सोमवारी टिटवाळ्यावरून सीएसटीला जाणाऱ्या लोकलमधील काही लोक दरवाजाच्या फूट बोर्डावर होते. मुंब्रा आणि दिवा या दोन्ही स्थानकांच्या दरम्यान असलेल्या वळणावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रेनची दरवाजाला लटकत असलेल्या प्रश्न धडक बसून १३ प्रवासी खाली पडले त्यातील ५ प्रवाशांचा मृत्य झाला .मृतांमध्ये केतन दिलीप सरोज (२३),राहुल संतोष गुप्ता , मयूर शहा, विकी बाबासाहेब मुखदाल ( रेल्वे पोलिस) आणि एका अज्ञाताचा समावेश आहे तर जखमी मध्ये शिवा गवळी,आवेश भोईर, रेहान शेख,अनिल मोरे,तुषार भगत,मनीष सरोज, मच्छिंद्र गोतरणे स्नेहा धोंडे,प्रियांका भाटिया यांचा समावेश आहे. सर्व जखमींना कळवा येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. ही घटना ९.३० च्या दरम्यान घडली असून ९.५० ला अम्बुलन्स दाखल झाल्या होत्या त्या सर्वांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने सर्व लोकल गाड्यांना स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या पुढे ज्या सर्वीस गाड्या येणार आहेत त्या सर्वे ऑटोमैटिक डोर क्लोजेससोबत फिटमेंटने येणार आहेत. आयसीएफद्वारे ज्या एक्झिास्टिंग लोकत आहेत त्या लोकलला रेट्रो फिटमेंटच्या माध्यमातून दरवाजा बद करण्याची सिस्टिम लावण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती स्वामील नीला यत्ती दिली.
दरम्यान ज्या ठिकाणी हा अपघात घडला त्या वळणावर दोन्ही ट्रॅक मधील अंतर कमी असल्याने अपघाताचा धोका आहे त्यामुळे रेल्वे प्रशासनाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी यापूर्वीच करण्यात आली होती पण प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केलं असा आरोप रेल्वे प्रवाशांनी केला आहे.तर रेल्वेच्या स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा निर्णयाला काही प्रवास आणि राजकीय पक्षांनीही विरोध केला आहे.
रेल्वे प्रशासना विरुद्ध मंगळवारी मनसेचा मोर्चा
मुंब्रा रेल्वे अपघाताला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करून मनसेने आज रेल्वे प्रशासनाच्या विरोधात मोर्चाचे आयोजन केले आहे.टिटवाळा येथील मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने काही महिन्यापूर्वीच ज्या ठिकाणी अपघात घडला तिथल्या धोकादायक वळणाबाबत रेल्वे प्रशासनाला पत्र लिहून उपाययोजना करण्याची मागणी केली होती पण त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले त्यामुळेच हा अपघात घडल्याचा मनसेचा आरोप आहे.
