ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

राज्यातील ९० व्यक्ती , ४० संस्थांना सामाजिक न्याय विभागाचे पुरस्कार जाहीर -१० जून रोजी मुंबईत पुरस्कार वितरण सोहळा

मुंबई, समाज कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने दरवर्षी सन्मानित करण्यात येते. आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीच्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, यंदा राज्यातील ९० व्यक्ती व ४० संस्थांचा समावेश असून एकूण १३० पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
या पुरस्कारांचे वितरण सोहळा दिनांक १० जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह, नरीमन पॉइंट, मुंबई येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री . देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, विधानसभा अध्यक्ष . राहुल नार्वेकर, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ तसेच खासदार अरविंद सावंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या पुरस्कारांमध्ये खालील प्रकारांचा समावेश आहे:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार – ६१ व्यक्ती (प्रत्येकी ₹७५,०००) व १० संस्था (प्रत्येकी ₹१ लाख)
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार – २७ व्यक्ती (प्रत्येकी ₹७५,०००) व ६ संस्था (प्रत्येकी ₹१ लाख)
कर्मवीर पद्मश्री दादासाहेब भाऊराव गायकवाड पुरस्कार – १ व्यक्ती (₹५१,०००) व १ संस्था (₹१ लाख)
संत रविदास पुरस्कार – १ व्यक्ती (₹५१,०००) व १ संस्था (₹१ लाख)
शाहू-फुले-आंबेडकर पारितोषिक – १४ संस्था (प्रत्येकी ₹७.५ लाख, चांदीचा स्क्रोल, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कार – ८ संस्था; राज्यस्तरावरील प्रथम पुरस्कार ₹५ लाख, द्वितीय ₹३ लाख, तृतीय ₹२ लाख, तर विभागीय स्तरावरील प्रत्येकी ₹१ लाखाचे पाच पुरस्कार.
सर्व पुरस्कारार्थ्यांना मुंबई येथील कार्यक्रमस्थळी उपस्थित राहण्यासाठी शासनाकडून निवास, भोजन व मुंबई दर्शनाची सुविधा दिली जाणार आहे. तसेच त्यांच्यासाठी संपर्क अधिकारीही नेमण्यात आले आहेत. समाज कल्याण विभागाचे अधिकारी पुरस्कारार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचे अभिनंदन करत आहेत.
या पुरस्कारांचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे करण्यात येत असून विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आणि आयुक्त श्री. ओमप्रकाश बकोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम चालू आहे. सहाय्यक सचिव श्री. सोमनाथ बागुल, उपसचिव श्री. रविंद्र गोरवे, आणि मुंबई प्रादेशिक विभागाचे उपायुक्त श्री. बाळासाहेब सोळंकी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण टीम नियोजनात व्यस्त आहे.
शासनाच्या या उपक्रमामुळे समाज कल्याण क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक व्यक्ती व संस्थांना प्रोत्साहन मिळत असून, राज्यभरातून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. शिक्षण, आरोग्य, अन्याय निर्मूलन, जनजागृती अशा विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्यांच्या योगदानाला शासनाकडून मान्यता मिळत असल्याने, हे पुरस्कार अधिक सन्माननीय ठरत आहेत.

error: Content is protected !!